शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शहराला १३ अग्निशमन केंद्रांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:51 PM

शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत आग लागते. कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी रात्रं-दिवस अग्निशमन विभागाला धावपळ करावी लागत आहे. पन्नास हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहरात आज तब्बल १३ अग्निशमन केंद्रांची गरज असताना अवघ्या तीन केंद्रांवर काम सुरू आहे. नवीन पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी मनपाला शासन निधी मिळाला.

ठळक मुद्देउपलब्ध फक्त तीन : दहा वर्षांपासून पाच नवीन केंद्र बांधण्याचा प्रस्ताव

औरंगाबाद : शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत आग लागते. कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी रात्रं-दिवस अग्निशमन विभागाला धावपळ करावी लागत आहे. पन्नास हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहरात आज तब्बल १३ अग्निशमन केंद्रांची गरज असताना अवघ्या तीन केंद्रांवर काम सुरू आहे. नवीन पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी मनपाला शासन निधी मिळाला. आजपर्यंत महापालिकेने एकही केंद्र उभारले नाही.शहर चारही दिशेने झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी २५ ते ३० हजार नागरिकांची या शहरात भर पडत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. बांधकाम नियमावलीत शासन दरवर्षी आमूलाग्र बदल करीत आहे. जमिनीचा जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून उंच इमारती बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहरात पूर्वी पाच मजली इमारतींचा ट्रेंड होता. मागील काही वर्षांमध्ये दहा मजलीपर्यंतही बांधकामे सुरू झाली आहेत. या उंच इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी महापालिकेकडे अत्याधुनिक यंत्रणाच नाही. औरंगपुºयातील फटाका मार्केटला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यामुळे तत्कालीन अग्निशमन अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. प्रत्येक पाच किलोमीटरच्या परिघात किमान एक तरी अग्निशमन केंद्र असावे, असा निकष आहे. महापालिका सध्या पदमपुरा, सिडको आणि एमआयडीसी चिकलठाणा येथे तीन अग्निशमन केंद्रे चालवीत आहे. शहरात केंद्रांची संख्या वाढवावी म्हणून शासनानेही ५ कोटींचा निधीही दिला होता. या निधीचा बट्ट्याबोळ केल्यानंतर आता दोन कोटीच शिल्लक आहेत. एवढ्या तुटपुंज्या निधीत नवीन पाच केंद्रे बांधणे अशक्यप्राय आहे. जुना निधी खर्च झालेला नसताना शासनाकडे आणखी निधीची मागणी कशी करणार? शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास तब्बल १३ केंद्रे असायला हवीत. नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचा जावईशोधही महापालिका प्रशासनाने लावला होता. अग्निशमन विभागासाठी नवीन पाच फायर टेंडर खरेदी करण्याचा मुद्याही मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे.--------------

टॅग्स :fireआगAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका