शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

शहराला टंचाईच्या झळा

By admin | Updated: July 5, 2014 00:35 IST

परभणी : राहाटी बंधारा आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील प्रत्येकी दोन विद्युत मोटारी पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

परभणी : राहाटी बंधारा आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील प्रत्येकी दोन विद्युत मोटारी पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.परभणी शहराला राहाटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यावर चार विद्युत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करुन हे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातून परभणी शहरापर्यंत पोहोचते. पंधरा दिवसांपासून राहाटी बंधाऱ्यावरील दोन विद्युत मोटारी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे दोन मोटारीतूनच पाणी उपसण्याचे काम चालते. दोनच मोटारींद्वारे पाणी उपसल्या जात असल्याने परभणी शहरातील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रावरील दोन विद्युत मोटारीदेखील बंद आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यात मोठा व्यत्यय येतो. सध्या नळांना दहा दिवसांतून एक वेळ पाणी येत आहे. शहरात पाणी सोडल्यानंतरही ते किती वेळ सोडावे, कोणत्या भागात सोडावे, याचे नियोजन नाही. त्यामुळे ठराविक भागातच दोन-दोन वेळा पाणी येते. त्याचप्रमाणे एकदा पाणी सोडल्यास ते बराच वेळ बंद केले जात नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो. आणखी एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्यात आहे. परंतु केवळ नियोजनाअभावी नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेने विद्युत मोटारींची तत्काळ दुरूस्ती करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पाण्याच्या टाकीवर कॅमेरे बसवाशहरात विद्यानगर येथे २, खंडोबा बाजार, खाजा कॉलनी, युसूफ कॉलनी, ममता कॉलनी, एम.आय.डी.सी., राजगोपालाचारी उद्यान या ठिकाणी प्रत्येकी एक अशा सात पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांवरुन नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु काही भागात डबल पाणीपुरवठा होतो तर काही भाग वंचित राहतो. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी होत आहे.मनपाचे आवाहनशहरातील अनेक भागात नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी आल्यानंतर नळाद्वारेदेखील पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून घ्याव्यात व पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.वाहिनीला अनेक भागात गळती परभणी शहरात अंथरलेली जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. त्यामुळे जलवाहिनी जागोजागी फुटलेली आहे. या लिकेजेसमधून बरेच पाणी वाया जाते. महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी लिकेज काढण्याचे काम हाती घेतले. रस्त्यांचे डांबरीकरण होत असताना ६० ते ७० टक्के लिकेजेस् काढण्यात आले आहेत. परंतु अजूनही अनेक भागात जलवाहिनी फुटलेली असून, ती दुरुस्त केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.