शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

छत्रपती संभाजीनगरकरांच्या बँकेत ५० हजार कोटींच्या ठेवी, वर्षभरात साडेसहा हजार कोटींची वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 5, 2024 12:18 IST

मध्यंतरी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले. यापासून धडा घेत ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा दाखविला.

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही शहराचा विकास व तेथील नागरिकांची सुबत्ता तपासायची असेल तर आर्थिक कुंडली बघणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेने छत्रपती संभाजीनगरची आर्थिक कुंडली तयार केली आहे. यात जिल्ह्यात आजघडीला सर्व प्रकारच्या ३८ बँका असून, त्यांच्या ५०७ शाखा आहेत. मागील वर्षभरात बँकांच्या ठेवीत ६ हजार ५३२ कोटींची वाढ होऊन ५० हजार कोटींचा आकडा पार केला आहे. बँकेत ठेवी ठेवण्याचा हा उच्चांक ठरला आहे.

कशा वाढत गेल्या ठेवी व कर्जवाटपकिती बँका---- मार्च २०२२-- मार्च २०२३---- मार्च २०२४१) बँकेत ठेवी : ३९ हजार ५४६ कोटी---४३ हजार ९१६ कोटी--- ५० हजार ४४८ कोटी२) कर्जवाटप : २९ हजार ५४६ कोटी--- ३४ हजार ९१६ कोटी--- ४३ हजार ५६१ कोटी

जिल्ह्यात ३८ बँकांच्या ५०७ शाखाबँक संख्या एकूण (शाखा)१) राष्ट्रीयीकृत १२ ----- १९९२) खासगी १५----१०२३) स्माॅल फायनान्स बँक ८---२७४) पेमेंट बँक ०१---२५) महाराष्ट्र ग्रामीण बँक ०१ --- ३९६) डीसीसी बँक ०१--- १३८

बँकेच्या शाखा वाढल्या एटीएमची संख्या घटलीशाखा----मार्च २२---मार्च २३---- मार्च २४बँकेच्या शाखा- ४७२--- ४८८--- ५०७एटीएम-- ६७२--- ६८१--- ६६२

यूपीआयने एटीएमवर परिणामडिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ६० टक्केपेक्षा अधिक ग्राहक यूपीआयने पेमेंट करीत आहेत. यामुळे एटीएममधून रक्कम काढणाऱ्यांची संख्या कमालीची घटत आहे. रोखेचे व्यवहार कमी होत असल्याने बँकांसाठी एटीएम म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखे झाले आहे. म्हणून तर जिल्ह्यात मागील वर्षभरात १९ एटीएमला कुलूप लावण्यात आले.

राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा वाढलामध्यंतरी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले. यापासून धडा घेत ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा दाखविला. परिणामी आजघडीला जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या एकूण ठेवी ३० हजार २६८ कोटींवर जाऊन पोहोचल्या. खासगी बँकेच्या एकूण ठेवी १४ हजार ६२ कोटींवर गेल्या आहेत.

बँकांच्या शाखा वाढीला मोठा वावग्रामीण भागातून अर्ध शहरी व शहरी भागात नागरिकांचे स्थलांतर वाढत आहे. शहरालगतच्या ५० किमी अंतरावर पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७७०० लोकसंख्येमागे एक बँक आहे. यामुळे बँकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यादृष्टीने बँकांची शाखा वाढत आहे. काही बँकांनी शाखा विस्तारासाठी प्रस्ताव पाठविले आहेत.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :bankबँकMONEYपैसाAurangabadऔरंगाबाद