शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कोरेगाव-भीमा येथील घटनेस मुख्यमंत्री जबाबदार; आपच्या प्रीती मेनन यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:52 PM

कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला.

ठळक मुद्दे कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच जर दलित बांधवांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आदेश दिले असते, तर महाराष्ट्रात उद्रेक झाला नसता, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजप, संघावर टीका केली. 

औरंगाबाद : कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच जर दलित बांधवांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत दोषींवर कारवाईचे आदेश दिले असते, तर महाराष्ट्रात उद्रेक झाला नसता, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजप, संघावर टीका केली. 

राज्यातील भाजप सरकारला शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे, त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना अटक करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकणार नाहीत,अशी टीका करीत फडणवीस सरकारने जे सिंचन प्रकल्प विरोध करीत रोखले होते, ते सर्व प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा सरकारने केल्याचे मेनन  यांनी नमूद केले. सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीनिमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाची पूर्वतयारी व पाहणी करण्यासाठी प्रीती मेनन आल्या होत्या. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.

गेल्या काही दिवसांपासून कुमार विश्वाससह पक्षातील काही जुने नेते हे पक्षाच्या कार्यपद्धतीवर आरोप करीत आहेत, याबद्दल विचारले असता, मेनन  म्हणाल्या की, हे सर्वच पक्षांत असते; मात्र प्रत्येकाला पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वागावे लागते, तसे केले नाही तर स्वत: बाहेर पडावे लागते किंवा पक्ष त्यांना बाहेर काढतो़  अण्णा हजारे जर आमच्या सोबत आले तर चांगलेच होईल, पण ते राजकारणापासून दूर आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रातील विकास आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी त्यांची भेट घेत सहकार्य करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

१२ जानेवारी रोजी घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात आम आदमी पार्टी लवकरच सक्रिय होणार आहे़  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय प्रवेशाची सुरुवात सिंदखेडराजापासून होईल़  १२ जानेवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर होणार्‍या सभेत ते महाराष्ट्रात आप सक्रिय होण्याची घोषणा करतील. जिल्हानिहाय कार्यकर्त्यांचे जाळे उभे करून आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २४५ जागा लढण्याची पक्षाची तयारी आहे़  

टॅग्स :AAPआपAurangabadऔरंगाबादMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार