शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला, एकनाथ शिंदेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:33 IST

पन्नास आमदार सत्तेला ठोकर मारून बाहेर पडले. कारण शिवसेनेचे खच्चीकरण होत होते.

 

वैजापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीला मतदान करणाऱ्या जनतेचा त्यांनी विश्वासघात केला आहे. काँग्रेसचे राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. मग अशा लोकांच्या हातात देश देण्यापेक्षा पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या हातात देश द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे केले. लोकसभेच्या तीनही टप्प्यात महायुती बाजी मारत आहे, असे ते म्हणाले.

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर शिंदे यांची जाहीर सभा झाली. सभेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार व उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पन्नास आमदार सत्तेला ठोकर मारून बाहेर पडले. कारण शिवसेनेचे खच्चीकरण होत होते. शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत होती. या पार्श्वभूमीवर सत्तांतर झाले. सत्ता येते, जाते पण नाव एकदा गेले की परत येत नाही, हे बाळासाहेबांचे शब्द होते. शिवसेनेचे दुकान बंद करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार होते. पण हे विचार सोडून जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कुणी केले? सत्तेसाठी शिवसेना संपत असताना उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याचे काम त्यांनी केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची विचारपूस करतात. महायुतीच्या सरकारने दोन वर्षांत शेतकरी, कष्टकरी, महिलांसाठी अनेक योजना आणल्या, असे ते म्हणाले. संविधान बदलण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असेही शिंदे म्हणाले. संदिपान भुमरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. त्यांनी वीस वर्षांच्या काळात एकही काम केले नाही. वीस वर्षे केंद्रात असूनही खैरे यांना केंद्राची एकही योजना माहिती नाही, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात आ. रमेश बोरनारे यांनी वैजापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तालुक्यातील रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज कॅबिनेटच्या शेवटच्या बैठकीत माफ केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी कैलास पाटील, संजना जाधव, एकनाथ जाधव, डॉ. दिनेश परदेशी, कल्याण दांगोडे, साबेर खान, पंकज ठोंबरे आदी उपस्थित होते.

नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडणारनांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. वैजापृूरचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या माध्यमातून घरोघरी पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

ही आनंदाची बाबमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब केले ही आनंदाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगरवर विशेष प्रेम होते. मुंबई, ठाण्यानंतर या वाघाने संभाजीनगरमध्ये डरकाळी फोडली होती, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेaurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४