शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मराठा मावळा संघटनेचे 'बोंबा मारो' आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: May 2, 2025 14:22 IST

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली

छत्रपती संभाजीनगर: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेच्यावतीने शुक्रवारी दिवसभर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार धरणे धरली आणि सरकारविरोधी बोम्बा मारल्या.

मावळा संघटनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जात आहे. मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर  धरणे आंदोलन करण्यात आले. विविध जिल्ह्यातील शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सोयाबिनला साडेसहा हजार रुपये प्रती क्वींटल हमी भाव मिळालाच पाहिजे,शेतकऱ्यांना वीज बील माफ करुन भारनियमनमुक्त करा, प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील त्रूटी दूर करुन सर्व बाधित शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, बीड, धाराशवी, लातुर आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करुन दोषीवर कारवाई करा, शेती पंपासाठी तात्काळ नवीन रोहित्र देण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. 

यावेळी देवेंद्र फडणवीस हाय, हाय, अजीत दादा हाय हाय, या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय आदी घोषणा देत राज्यसरकारच्या नावाने बोंबा मारल्या. या आंदोलनात पंढरीनाथ गोडसे पाटील, भारत कदम, गणेश वडकर, हनुमंत कदम, गोपीनाथ निकम पाटील, विजय म्हस्के, बाळासाहेब भुमे, कल्पना चव्हाण, रंजना कोलते, ज्योती पवार, सुनीता पाटील, जयश्री दाभाडे, विद्या माहिते, रजनी अजबे, प्रतिभा बागडे, राणी पवार, लता कासार, छाया महेर, राजकन्या जावळे, मीना शिंदे, मनीषा जगताप आणि रेखा थिटे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर