शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगरची जागा 'वंचित'चीच; बाळासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनेने आघाडीत खळबळ

By स. सो. खंडाळकर | Updated: March 15, 2024 11:28 IST

महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभेची जागा ही वंचित बहुजन आघाडीची असून ती आम्ही जिंकलेली असल्याने आम्ही सोडणार नसल्याचे जाहीर करून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त घोषणा केली परंतु उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे. यावेळी आपण अकोल्यातून एकाच ठिकाणाहून लढणार आहोत. अमरावतीहून सुजात आंबेडकर यांनी लढावे असा जनतेचा आग्रह आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत हे नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत? उबाठाचे, शरद पवारांचे की काँग्रेसचे असा सवाल उपस्थित करीत त्यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला.

यावेळी डॉ. धैर्यवान पुंडकर,सिद्धार्थ मोकळे, प्रभाकर बकले, योगेश बन, ॲड. लता बामणे, महेश निनाळे, पंडितराव तुपे, रवी तायडे, सय्यद जफर आदींची उपस्थिती होती.

मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा,संपवण्याचा प्रयत्न होईलमनोज जरांगेंना संपवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना बदनाम केले जाईल. नजीकच्या काळात मॉर्फिंग करून त्यांना अश्लील स्वरूपात दाखवण्यात येईल, त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे खळबळजनक आवाहन ॲड. आंबेडकरांनी केले. ते म्हणाले, मनोज जरांगे यांचे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाला काबूत घेता आले नाही. नाना तऱ्हेने ते दाबण्याचा प्रयत्न होत आहे. माझी अधिकृत माहिती आहे की, जरांगे पाटील यांचा व्हिडीओ तयार करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यांच्या समर्थकांना विचलित करण्याचा यातून प्रयत्न होणार आहे. हे अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले जाणार आहे. मी हा व्हिडीओ पाहिला नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वत: जरांगे पाटील यांनीही याबद्दलची दक्षता घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. आंबेडकर पुढे म्हणाले, अशा बदनामीपासून वाचण्यासाठी आता जरांगेंनी राजकीय प्रवास सुरू केला पाहिजे. जे आरक्षण मिळाले आहे, ते टिकवण्याची पहिली जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्याच समाजातून विरोध करणाऱ्यांनाही हेच उत्तर राहील. जरांगेंमुळे प्रस्थापित मराठ्यांना धक्का बसू शकतो. अधिक उमेदवार करण्यामुळे ईव्हीएम बाद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी