शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आव्हान; पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:07 IST

नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दुपारी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढलेली गुन्हेगारी, ठिकठिकाणी भूमाफियांची गुंडगिरी, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे थांबवण्याचे आव्हान नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर असेल. गेल्या वर्षभरात शहरात कथित गावगुंडांनी तोंड वर काढल्याने त्यांच्यावरही आयुक्त पवार कसे वचक निर्माण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. पवार यांनी दुपारी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बराच वेळ अन्य अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.

तत्कालीन आयुक्त मनोज लोहिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाने नक्षली विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपवला होता. पाटील यांनी झपाट्याने काम सुरू केल्याने त्यांच्याच पूर्णवेळ नियुक्तीची चर्चा होती. मात्र, शासनाने पुण्याचे सहआयुक्त प्रवीण पवार यांची पूर्णवेळ आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. बुधवारी पवार यांना पुणे पेालिसांनी निरोप दिला. त्यानंतर गुरुवारी सकाळी पवार शहरात दाखल झाले. दुपारी १.३० वाजता मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.

गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आवाहनगेल्या पाच महिन्यांमध्ये लुटमार, चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी विक्रम रचला आहे. १३७ घरफोड्या, ४८७ वाहन चोऱ्या, तर ८१ नागरिकांना लुटले गेले. यातील बोटांवर मोजण्याइतक्याच घटनांमध्ये पोलिस गुन्हेगारांचा शोध लावू शकले. पोलिस ठाण्यांमधील डीबी पथके ‘अर्थपूर्ण’ कामातच गुंतली असल्याने गुन्हेगारांवरचा वचकदेखील संपला आहे. त्यामुळे सुस्तावलेल्या डीबी पथकांना सरळ करून गुन्हेगारी आटोक्यात आणून धार्मिक तणाव हाताळण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त पवार यांच्यासमोर आहे.

कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य द्यापवार यांनी सायंकाळी शहराचे पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सर्व ठाणे प्रभारींची बैठक घेतली. यात त्यांनी शहरातील पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. शिवाय, त्यांना अपेक्षित कामाच्या शैलीविषयीदेखील स्पष्ट सूचना केल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची सर्वाधिक कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य राहायला हवे, अशी सक्त सूचनाच त्यांनी केली. ठाण्यांमधील सर्व संसाधने व्यवस्थित ठेवा, पोलिसांचे दैनंदिन काम जसे की रेकॉर्ड सांभाळणे, गुन्हेगारांवर पाळत ठेवणे, प्रतिबंधात्मक कारवाया हे वेळेवर पार पडले पाहिजे. पोलिस कुठेही कमी पडता कामा नये, अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस