शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

By विजय सरवदे | Updated: July 19, 2023 11:30 IST

‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागातील चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. तथापि, अडथळ्यांची शर्यत पार करत जि.प. पाणीपुरवठा विभागाची घोडदौड सुरू असली तरी डिसेंबर २०२३ अखेपर्यंत या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता धुसर झाली आहे. प्रामुख्याने सातत्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या १,२४१ गावांना ‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात १,१६१ योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये कमीत कमी २५ हजार लिटर क्षमतेपासून जास्तीत जास्त एक लाख लिटरपर्यंत सुमारे सव्वाआठशे जलकुंभ (पाण्याची टाकी), तलाव परिसरात २५० विहिरी, विहिरीपासून टाकीपर्यंत जलवाहिनी व घरापर्यंत नळजोडणी या कामांचा समावेश आहे.

मात्र, या सरकारी योजनेला सरकारी कार्यालयांकडूनच खोडा घातला असल्यामुळे ही योजना थोडी बॅकफूटवर गेली. तलाव परिसरापासून २०० मीटर क्षेत्रात विहीर घेण्यास सिंचन विभागाने आडकाठी निर्माण केली. त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सचिवालयापर्यंत संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही त्यास लेखी स्वरूपात परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जि.प. यंत्रणेने २०० मीटरच्या आत विहिरींची कामे सुरू केली आहेत. दुसरीकडे, या योजनेचे काम थेट जि.प. पाणीपुरवठा विभागामार्फतच राबविण्यात येत असल्यामुळे काही सरपंच दुखावले गेले आहेत. काहींनी टक्केवारीसाठी कंत्राटदारांकडे आग्रह धरला. काहीजण गरज नसेल, तेथे जीआय पाइपसाठी अडून बसले, त्यामुळे अनेक गावांमध्ये कामे थांबली. त्यामुळे ‘सीईओ’ मीना यांनी अशा सरपंचांना संपर्क साधून कामांना अडथळा आणू नये, अशी विनंती केली. तरीही काहींनी विरोध कायम ठेवला. अशा सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मार्च २०२४ पर्यंत सर्वांना पाणीयासंदर्भात जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, सध्या सर्व अडथळ्यांवर मात करत योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाने डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत योजना मार्गी लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीदेखील मार्च २०२४ पर्यंत ही योजना परिपूर्णपणे यशस्वी होईल.

- १,२४१ गावांसाठी ‘जलजीवन मिशन’ योजना- १,१६१ कामांचा अंतर्भाव- ५३ गावांना आतापर्यंत नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा सुरू- ६७७ कोटी सात लाखांचा अंदाजे खर्च- चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट- तीन लाख ६४ हजार १६५ घरांना आजपर्यंत नळजोडणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद