शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

By विजय सरवदे | Updated: July 19, 2023 11:30 IST

‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ग्रामीण भागातील चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. तथापि, अडथळ्यांची शर्यत पार करत जि.प. पाणीपुरवठा विभागाची घोडदौड सुरू असली तरी डिसेंबर २०२३ अखेपर्यंत या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता धुसर झाली आहे. प्रामुख्याने सातत्याने पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या १,२४१ गावांना ‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात १,१६१ योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये कमीत कमी २५ हजार लिटर क्षमतेपासून जास्तीत जास्त एक लाख लिटरपर्यंत सुमारे सव्वाआठशे जलकुंभ (पाण्याची टाकी), तलाव परिसरात २५० विहिरी, विहिरीपासून टाकीपर्यंत जलवाहिनी व घरापर्यंत नळजोडणी या कामांचा समावेश आहे.

मात्र, या सरकारी योजनेला सरकारी कार्यालयांकडूनच खोडा घातला असल्यामुळे ही योजना थोडी बॅकफूटवर गेली. तलाव परिसरापासून २०० मीटर क्षेत्रात विहीर घेण्यास सिंचन विभागाने आडकाठी निर्माण केली. त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सचिवालयापर्यंत संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही त्यास लेखी स्वरूपात परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जि.प. यंत्रणेने २०० मीटरच्या आत विहिरींची कामे सुरू केली आहेत. दुसरीकडे, या योजनेचे काम थेट जि.प. पाणीपुरवठा विभागामार्फतच राबविण्यात येत असल्यामुळे काही सरपंच दुखावले गेले आहेत. काहींनी टक्केवारीसाठी कंत्राटदारांकडे आग्रह धरला. काहीजण गरज नसेल, तेथे जीआय पाइपसाठी अडून बसले, त्यामुळे अनेक गावांमध्ये कामे थांबली. त्यामुळे ‘सीईओ’ मीना यांनी अशा सरपंचांना संपर्क साधून कामांना अडथळा आणू नये, अशी विनंती केली. तरीही काहींनी विरोध कायम ठेवला. अशा सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मार्च २०२४ पर्यंत सर्वांना पाणीयासंदर्भात जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले की, सध्या सर्व अडथळ्यांवर मात करत योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाने डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत योजना मार्गी लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीदेखील मार्च २०२४ पर्यंत ही योजना परिपूर्णपणे यशस्वी होईल.

- १,२४१ गावांसाठी ‘जलजीवन मिशन’ योजना- १,१६१ कामांचा अंतर्भाव- ५३ गावांना आतापर्यंत नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा सुरू- ६७७ कोटी सात लाखांचा अंदाजे खर्च- चार लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट- तीन लाख ६४ हजार १६५ घरांना आजपर्यंत नळजोडणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद