शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

पर्यटनाच्या राजधानीत आहेत ३०० प्रकारचे पक्षी; अजिंठा लेणी परिसरात आहेत सर्वाधिक पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 20:36 IST

औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून ...

ठळक मुद्देअजिंठ्यात निर्माण झाली बुलबूल वसाहत 

औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून येतात. विशेष म्हणजे येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात सर्वाधिक पक्षी आहेत; पण त्यातही बुलबूल पक्ष्यांची मोठी वसाहत याच ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. 

जैवविविधतेसाठी औरंगाबाद जिल्हा समृद्ध आहे. त्याची प्रचीती या हंगामात सर्वांना येत आहे. जायकवाडीचे धरण, सुखना, नांदूर मधमेश्वर,  गौताळा अभयारण्य आदी भाग पक्षीमित्रांसाठी पर्वणीच ठरत आहे. एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन अ‍ॅण्ड एज्युकेशनल अकॅडमीचे संस्थापक पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३०० प्रजातींच्या पक्ष्यांपैकी ८४ ते ८५ प्रकारचे पक्षी हे विदेशी आहेत. देशातील व विदेशातील पक्षी हजारो कि.मी.चा प्रवास करून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात पाहुणे म्हणून येतात आणि त्यांचा फेब्रुवारीपासून परतीचा प्रवास सुरू होऊन जातो. मार्च अखेरपर्यंत सर्वजण येथून निघून जातात.

फ्लेमिंगो हे सौराष्ट्रातून येतात. शोवलर्स हे दक्षिण युरोप, पूर्व सायबेरियामधून शोेवलर्स पक्षी, गोडविटस् पूर्व सायबेरियामधून येथे येतात. यांसारखे अनेक विदेशी पक्षी येथे दिसतात. १८ प्रकारचे बदक आढळून आले आहे. त्यातील १६ प्रकारचे बदक हे स्थलांतरित आहेत. त्यातील बहुतांश बदक एशियामधून जिल्ह्यात येतात. या काळात तिकडे बर्फ पडत असतो. अन्नाच्या शोधासाठी हजारो कि.मी.चा प्रवास करीत ते येथे येतात. कारण, आपल्या जिल्ह्यात पाणथळी आहेत. यंदा दुष्काळ असला तरी जायकवाडीत पाणी आहे. विविध फळझाडेही जिल्ह्यात आहेत.  पक्ष्यांसाठी पोषक वातावरण असल्याने  विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात. पक्ष्यांच्या रक्षणासाठी त्यांना भयमुक्त वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत यार्दी यांनी व्यक्त केले. 

अजिंठ्यात नवीन विकास आराखडाएमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी सांगितले की, अजिंठ्यात नवीन विकास आराखडा पूर्ण झाला आहे. तो निसर्गानुकूल केला आहे, तसेच २००२ पासून लेणी परिसरात येणाऱ्या गाड्यांवर बंदी आणली आहे. प्रदूषणविरहित गाड्यांना प्रवेश दिला जात आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबविण्यात यश आले आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. यात बुलबूल पक्ष्यांची संख्या एवढी वाढली आहे की, बुलबूल वसाहतच निर्माण झाली आहे. 

पक्षी वाढविण्यासाठी काय करावे- नागरिकांनी वृक्ष, झुडपे लावावीत. - फळे, फुले असलेली वृक्षे लावावीत.- उन्हाळ्यात गच्चीवर, झाडाच्या फांदीला पाणी असलेली मातीची भांडी लटकवून ठेवावीत. 

माणसे पक्ष्यांशिवाय जगू शकत नाहीतपक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले की, निसर्गसंवर्धनाचे कार्य पक्षी मोठ्या प्रमाणात करतात. पक्षी माणसांशिवाय जगू शकतात; पण माणसे पक्ष्यांशिवाय जगू शकत नाहीत.  

टॅग्स :tourismपर्यटनbirds sanctuaryपक्षी अभयारण्यAurangabadऔरंगाबादNatureनिसर्ग