शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाच्या राजधानीत आहेत ३०० प्रकारचे पक्षी; अजिंठा लेणी परिसरात आहेत सर्वाधिक पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 20:36 IST

औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून ...

ठळक मुद्देअजिंठ्यात निर्माण झाली बुलबूल वसाहत 

औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून येतात. विशेष म्हणजे येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात सर्वाधिक पक्षी आहेत; पण त्यातही बुलबूल पक्ष्यांची मोठी वसाहत याच ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. 

जैवविविधतेसाठी औरंगाबाद जिल्हा समृद्ध आहे. त्याची प्रचीती या हंगामात सर्वांना येत आहे. जायकवाडीचे धरण, सुखना, नांदूर मधमेश्वर,  गौताळा अभयारण्य आदी भाग पक्षीमित्रांसाठी पर्वणीच ठरत आहे. एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन अ‍ॅण्ड एज्युकेशनल अकॅडमीचे संस्थापक पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३०० प्रजातींच्या पक्ष्यांपैकी ८४ ते ८५ प्रकारचे पक्षी हे विदेशी आहेत. देशातील व विदेशातील पक्षी हजारो कि.मी.चा प्रवास करून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात पाहुणे म्हणून येतात आणि त्यांचा फेब्रुवारीपासून परतीचा प्रवास सुरू होऊन जातो. मार्च अखेरपर्यंत सर्वजण येथून निघून जातात.

फ्लेमिंगो हे सौराष्ट्रातून येतात. शोवलर्स हे दक्षिण युरोप, पूर्व सायबेरियामधून शोेवलर्स पक्षी, गोडविटस् पूर्व सायबेरियामधून येथे येतात. यांसारखे अनेक विदेशी पक्षी येथे दिसतात. १८ प्रकारचे बदक आढळून आले आहे. त्यातील १६ प्रकारचे बदक हे स्थलांतरित आहेत. त्यातील बहुतांश बदक एशियामधून जिल्ह्यात येतात. या काळात तिकडे बर्फ पडत असतो. अन्नाच्या शोधासाठी हजारो कि.मी.चा प्रवास करीत ते येथे येतात. कारण, आपल्या जिल्ह्यात पाणथळी आहेत. यंदा दुष्काळ असला तरी जायकवाडीत पाणी आहे. विविध फळझाडेही जिल्ह्यात आहेत.  पक्ष्यांसाठी पोषक वातावरण असल्याने  विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात. पक्ष्यांच्या रक्षणासाठी त्यांना भयमुक्त वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत यार्दी यांनी व्यक्त केले. 

अजिंठ्यात नवीन विकास आराखडाएमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी सांगितले की, अजिंठ्यात नवीन विकास आराखडा पूर्ण झाला आहे. तो निसर्गानुकूल केला आहे, तसेच २००२ पासून लेणी परिसरात येणाऱ्या गाड्यांवर बंदी आणली आहे. प्रदूषणविरहित गाड्यांना प्रवेश दिला जात आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबविण्यात यश आले आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. यात बुलबूल पक्ष्यांची संख्या एवढी वाढली आहे की, बुलबूल वसाहतच निर्माण झाली आहे. 

पक्षी वाढविण्यासाठी काय करावे- नागरिकांनी वृक्ष, झुडपे लावावीत. - फळे, फुले असलेली वृक्षे लावावीत.- उन्हाळ्यात गच्चीवर, झाडाच्या फांदीला पाणी असलेली मातीची भांडी लटकवून ठेवावीत. 

माणसे पक्ष्यांशिवाय जगू शकत नाहीतपक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले की, निसर्गसंवर्धनाचे कार्य पक्षी मोठ्या प्रमाणात करतात. पक्षी माणसांशिवाय जगू शकतात; पण माणसे पक्ष्यांशिवाय जगू शकत नाहीत.  

टॅग्स :tourismपर्यटनbirds sanctuaryपक्षी अभयारण्यAurangabadऔरंगाबादNatureनिसर्ग