शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

'आयटीआय' नोकरभरतीत बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवार बाद होणार

By राम शिनगारे | Updated: August 21, 2023 13:31 IST

राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आठ पदांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर : आयटीआय संस्थांमधील सुरु असलेल्या नोकरभरतीमध्ये एकाच उमेदवाराने वेगवेगळ्या आठ पदांसाठी स्वतंत्र अनुभव प्रमाणपत्र सादर करून प्राथमिक गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. हा घोटाळा ' लोकमत ' ने उघडकीस आणल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढून उमेदवारांचे अनुभव प्रमाणपत्र पडताळणीमध्ये बनावट असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे पात्रताधारक शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आठ पदांचा समावेश आहे. शेकडो उमेदवारांनी आठही पदांसाठीची एकाच कंपनीकडून वेगवेगळी बनावट अनुभव प्रमाणपत्रे हस्तगत करीत अर्ज केल्याचे परीक्षेनंतर जाहीर झालेल्या प्राथमिक गुणवत्ता यादीतून उघडकीस आले होते. याविषयी 'काय सांगता? ७७२ पदांच्या भरतीत घोटाळा! ' या मथळ्याखाली ' लोकमत ' ने शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची तत्काळ दखल घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने त्याच दिवशी सायंकाळी परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीच्या आधीन राहून १६ एप्रिल रोजी घेतलेल्या परीक्षेकरिता परवानगी देण्यात आली होती. तसेच प्राथमिक गुणवत्ता यादी ही तात्पुरती आहे. यानंतर उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करून निवड सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र, कागदपत्रांची पडताळणीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यात अनुभव प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे बनावट आढळल्यास संबंधित उमेदवार पुढील भरती प्रक्रियेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असे संचालक दिगंबर दळवी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा

...तर हा उमेदवारांवर अन्याय ठरेलएकाच उमेदवाराने आठ पदांसाठी अर्ज केलेला असेल तर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय त्यास यादीतून वळगणे अन्यायकारक ठरले. त्यामुळे उमेदवारांच्या अनुभव प्रमाणपत्रांची पडताळणी करताना बनावट आढळल्यास संबंधितास भरती प्रक्रियेतूनच बाद ठरविण्याची कार्यवाही केली जाईल. एकापेक्षा अधिक पदांसाठी उमेदवार पात्र ठरल्यास ज्या पदावर रुजू होण्यास तो इच्छुक असेल त्या पदाचेच नियुक्ती आदेश जारी करण्यात येतील, असेही संचालक दळवी यांनी कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार