शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

सभेला एक लाख लोक आले तरच उमेदवारीचा विचार; उदय सामंतांचा खळबळजनक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 19:03 IST

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, उदय सामंत यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या २० ऑगस्टपासून मराठवाड्यात सभा होतील. या सभांना एक लाख लोक आले तरच, आमदारांच्या उमेदवारीचा विचार होईल, अन्यथा तिकीट कापले जाईल, असा इशाराच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे महायुतीच्या आमदारांना दिला. सामंतांच्या इशाऱ्याने आमदारांमध्ये खळबळ उडाली.

संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी महायुतीच्या मराठवाडा पदाधिकारी समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला उद्योग मंत्री सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, आ. अनिकेत तटकरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. रमेश कराड, आ. तानाजी मुटकुळे, आ. ज्ञानराज चौघुले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कैलास पाटील, शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरत राजपूत, भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खंबायते, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख अभिजित देशमुख आणि समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन जाेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आ. तटकरे यांनी प्रास्ताविक केले.

सामंत म्हणाले की, शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपसातील हेवेदावे दूर ठेवून एकसंधपणे निवडणूक जिंकायची आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होऊ द्यायचे नाही.

खा. भुमरे म्हणाले की, महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम केल्याने छत्रपती संभाजीनगरचा गड जिंकला. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ९ जागा महायुतीने जिंकायच्या आहेत. खा. डॉ. कराड, आ. शिरसाट यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सरकारने सर्व घटकांसाठी योजना आणल्याचे नमूद केले.

सावत्र भावांना लोळवायचेलाडक्या बहिणींबद्दल वाईट विचार करणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोळवायचे असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये मंजूर केल्याचे सावे म्हणाले.

२० सप्टेंबर रोजी आचारसंहिता३८ दिवसांनी अर्थात २० सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता सावे यांनी व्यक्त केली. १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होईल. यामुळे पुढील दिवसांत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahayutiमहायुती