शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सभेला एक लाख लोक आले तरच उमेदवारीचा विचार; उदय सामंतांचा खळबळजनक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 19:03 IST

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, उदय सामंत यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या २० ऑगस्टपासून मराठवाड्यात सभा होतील. या सभांना एक लाख लोक आले तरच, आमदारांच्या उमेदवारीचा विचार होईल, अन्यथा तिकीट कापले जाईल, असा इशाराच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे महायुतीच्या आमदारांना दिला. सामंतांच्या इशाऱ्याने आमदारांमध्ये खळबळ उडाली.

संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी महायुतीच्या मराठवाडा पदाधिकारी समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला उद्योग मंत्री सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, आ. अनिकेत तटकरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. रमेश कराड, आ. तानाजी मुटकुळे, आ. ज्ञानराज चौघुले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कैलास पाटील, शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरत राजपूत, भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खंबायते, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख अभिजित देशमुख आणि समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन जाेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आ. तटकरे यांनी प्रास्ताविक केले.

सामंत म्हणाले की, शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपसातील हेवेदावे दूर ठेवून एकसंधपणे निवडणूक जिंकायची आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होऊ द्यायचे नाही.

खा. भुमरे म्हणाले की, महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम केल्याने छत्रपती संभाजीनगरचा गड जिंकला. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ९ जागा महायुतीने जिंकायच्या आहेत. खा. डॉ. कराड, आ. शिरसाट यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सरकारने सर्व घटकांसाठी योजना आणल्याचे नमूद केले.

सावत्र भावांना लोळवायचेलाडक्या बहिणींबद्दल वाईट विचार करणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोळवायचे असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये मंजूर केल्याचे सावे म्हणाले.

२० सप्टेंबर रोजी आचारसंहिता३८ दिवसांनी अर्थात २० सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता सावे यांनी व्यक्त केली. १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होईल. यामुळे पुढील दिवसांत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahayutiमहायुती