शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 11:52 IST

C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार

- विकास राऊतऔरंगाबाद : हवामानाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी औरंगाबादेत सी-बँड रडार डॉप्लर बसविण्यास (C-band radar to be set up in Aurangabad) केंद्र सरकारच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे ( Farmers in Marathwada will get accurate weather forecast ). मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा मैलाचा दगड ठरणार आहे. लोकमतने विशेष मालिकेतून हा विषय लावून धरला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ( Prakash Jawadekar ) यांच्याकडे यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यालाही यश आले आहे.

केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी औरंगाबादेत सी-बँड डॉपलर रडारला मान्यता दिली असल्याचे पत्र नुकतेच दिले आहे. भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून सी-बँड रडार बसविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका सी-बँड डॉपलर रडार बजावणार आहे. किमान तीनशे ते चारशे किलोमीटरचा परीघ या रडारच्या नियंत्रणात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. रडार कार्यान्वित होताच शेतकऱ्यांना हवामान बदलासंदर्भात अचूक माहिती मिळणार आहे.

औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद हे जिल्हे पर्यावरणीय बदल, हवामान आणि तापमानवाढ या संदर्भात संवेदनशील असल्याचे ‘टेरी’च्या (द एनर्जी ॲण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) अहवालामध्ये नमूद केले आहे. सातत्याने हवामान तसेच वातावरणातील बदलाचा फटका बसून मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्रासमोर मोठे संकट दशकभरापासून निर्माण झाले आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला आहे. दशकभरात नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यामागे हवामानातील बदल आणि आर्थिक नैराश्य ही प्रमुख कारणे असल्याचे अनेक अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. केंद्र आणि राज्य सरकारने १० वर्षांमध्ये किमान १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुदानावर खर्च केले आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये औरंगाबाद येथील सी-बँड डॉपलर रडार फायदेशीर राहणार आहे.

केंद्र सरकार आणि लोकमतचे अभिनंदनमराठवाड्यासाठी ही उपयुक्त यंत्रणा आहे. अर्थात, या यंत्राद्वारे दुष्काळ निर्मूलन होणार नाही, पण संभाव्य परिस्थितीची पूर्वकल्पना यातून मिळेल. या यंत्रणेने हवामानाचा जसा अंदाज वर्तविला, त्यानुसार शेतकऱ्यांना पेरणी मागे-पुढे करता येईल किंवा पिकांच्या कापणीच्या वेळापत्रकात बदलही करता येईल. सध्या आठ जिल्ह्यांसाठी ही यंत्रणा एकाच ठिकाणी आहे, पण भविष्यात ती अधिक मायक्रो लेव्हलवर न्यावी लागेल. जालना जिल्ह्यात यंदा १० किलोमीटरच्या परिघात तीन प्रकारचा पाऊस पडला. अल्प, मध्यम आणि मुसळधार. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज येऊ शकेल, अशी यंत्रणा असावी. या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आणि विषय लावून धरल्याबद्दल तुमचेही अभिनंदन.- विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ.

यंत्रणा २४ तास चालावीसर्व शेतकऱ्यांसाठी आणि नियोजनकर्त्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या यंत्रणेची मराठवाड्याला खूप गरज होती. ती कार्यान्वित झाल्यास अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळामुळे होणारे नुकसान टाळता येईल. ‘क्लाऊड मॉनिटरिंग’ करता येईल. यातून वीज कुठे पडण्याची शक्यता आहे, पावसाचे प्रमाण नजीकच्या भविष्यात किती आहे हे लक्षात येईल आणि ढगफुटीची शक्यता असेल तर तिचा परीघ किती असेल, याचाही अंदाज येईल. या यंत्रणेचा परीघ २५० ते ३०० किमी असल्यामुळे मराठवाड्यासह खान्देश, अहमदनगर, नाशिक, विदर्भातील काही जिल्ह्यांनाही याचा फायदा होईल. ही यंत्रणा सरकारने २४ तास अविरत (अगदी शनिवार, रविवार किंवा सुटीच्या दिवशीही) सुरू ठेवावी आणि ती या विषयाच्या अभ्यासकांनाही उपलब्ध करून द्यावी.- श्रीनिवास औंधकर, हवामान शास्त्रज्ञ, एमजीएम विज्ञान केंद्र.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतMarathwadaमराठवाडाenvironmentपर्यावरणRainपाऊसweatherहवामानagricultureशेती