शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

जसा अनुभव वाढतो तशी लाचखोरी वाढते; ४० ते ५० वयातील सरकारी बाबू लाच घेण्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:25 IST

Anti Corruption cases या कारवाईत पकडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांमार्फत लाचेची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यामार्फत लाच घेतली.

ठळक मुद्देलाचेची रक्कमही शासनाकडून तक्रारदाराला लगेच परत केली जाते.वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाई

औरंगाबाद : लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. तरीही सरकारी काम करण्यासाठी लाच घेण्यात ४० ते ५० वयोगटातील कर्मचारी निर्ढावल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. औरंगाबाद परिक्षेत्रात गतवर्षी ४१ ते ५० वयाचे सर्वाधिक ४२ आणि यावर्षी दोन महिन्यांत पाच लोकसेवकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

कोणतेही सरकारी काम सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोफत करणे बंधनकारक आहे. हे काम करण्यासाठी शासनाकडून त्यांना वेतन मिळते. असे असूनही सरकारी अधिकारी, कर्मचारी सामान्यांना वेठीस धरून लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा अनुभव पदोपदी नागरिकांना येतो. लाचखोर लोकसेवकांना पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत गतवर्षी १२६ लोकसेवकांना लाच घेताना पकडले, तर यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या आजच्या तारखेपर्यंत २९ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांमार्फत लाचेची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यामार्फत लाच घेतली. लाच घेणाऱ्या सर्वांच्या वयोगटाचा विचार केला असता ४१ ते ५० वयाच्या लोकसेवकांकडून लाचेची मागणी अधिक होत असल्याचे समोर आले.

गतवर्षी २०२० मध्ये औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत ४१ ते ५० वयाच्या ४५ भ्रष्ट लोकांना एसीबीने पकडले. यात तीन खासगी व्यक्तींचा समावेश आहे. यावर्षी दोन महिन्यांत २९ जणांवर कारवाई झाली. यात ४१ ते ५० वयाचे पाच लाचखोर आहेत, तर गतवर्षी २० ते ३० वयोगटातील सर्वांत कमी सहा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि १० खासगी व्यक्तींना लाच घेताना अटक झाली. ३१ ते ४० वयोगटातील २६ सरकारी बाबू आणि १० खासगी व्यक्तींना अटक झाली. सरकारी सेवेतील उतरता काळ म्हणून वयाची ५१ ते ६० हा कालावधी गणला जातो. या वयाचे २८ जण गतवर्षी लाचेच्या जाळ्यात अडकले होते.

२०१८ ते २०२० दरम्यान एसीबीची अशी झाली कारवाई- २०१८ ला १२२ लाचखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविले .- २०१९ ला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १२४ सापळे रचून १६८ लाचखोरांवर अटकेची कारवाई केली.- २०२० ला औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये १२६ लाचखोरांवर गुन्हे नोंदवून लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले.

वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाईतक्रार आल्यावर एसीबीकडुन तातडीने सापळा रचून कारवाई होते. गतवर्षी ४१ ते ५० वयाचे सर्वाधिक लोकसेवक लाच घेताना पकडले गेले हे खरे आहे. आम्ही वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाई करतो. यामुळे लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध नागरिकांनी एसीबीकडे टोल फ्री क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करावी. लाचेची रक्कमही शासनाकडून तक्रारदाराला लगेच परत केली जाते.- डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र एसीबी

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी