शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जसा अनुभव वाढतो तशी लाचखोरी वाढते; ४० ते ५० वयातील सरकारी बाबू लाच घेण्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:25 IST

Anti Corruption cases या कारवाईत पकडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांमार्फत लाचेची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यामार्फत लाच घेतली.

ठळक मुद्देलाचेची रक्कमही शासनाकडून तक्रारदाराला लगेच परत केली जाते.वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाई

औरंगाबाद : लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. तरीही सरकारी काम करण्यासाठी लाच घेण्यात ४० ते ५० वयोगटातील कर्मचारी निर्ढावल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. औरंगाबाद परिक्षेत्रात गतवर्षी ४१ ते ५० वयाचे सर्वाधिक ४२ आणि यावर्षी दोन महिन्यांत पाच लोकसेवकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

कोणतेही सरकारी काम सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोफत करणे बंधनकारक आहे. हे काम करण्यासाठी शासनाकडून त्यांना वेतन मिळते. असे असूनही सरकारी अधिकारी, कर्मचारी सामान्यांना वेठीस धरून लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा अनुभव पदोपदी नागरिकांना येतो. लाचखोर लोकसेवकांना पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत गतवर्षी १२६ लोकसेवकांना लाच घेताना पकडले, तर यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या आजच्या तारखेपर्यंत २९ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांमार्फत लाचेची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यामार्फत लाच घेतली. लाच घेणाऱ्या सर्वांच्या वयोगटाचा विचार केला असता ४१ ते ५० वयाच्या लोकसेवकांकडून लाचेची मागणी अधिक होत असल्याचे समोर आले.

गतवर्षी २०२० मध्ये औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत ४१ ते ५० वयाच्या ४५ भ्रष्ट लोकांना एसीबीने पकडले. यात तीन खासगी व्यक्तींचा समावेश आहे. यावर्षी दोन महिन्यांत २९ जणांवर कारवाई झाली. यात ४१ ते ५० वयाचे पाच लाचखोर आहेत, तर गतवर्षी २० ते ३० वयोगटातील सर्वांत कमी सहा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि १० खासगी व्यक्तींना लाच घेताना अटक झाली. ३१ ते ४० वयोगटातील २६ सरकारी बाबू आणि १० खासगी व्यक्तींना अटक झाली. सरकारी सेवेतील उतरता काळ म्हणून वयाची ५१ ते ६० हा कालावधी गणला जातो. या वयाचे २८ जण गतवर्षी लाचेच्या जाळ्यात अडकले होते.

२०१८ ते २०२० दरम्यान एसीबीची अशी झाली कारवाई- २०१८ ला १२२ लाचखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविले .- २०१९ ला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १२४ सापळे रचून १६८ लाचखोरांवर अटकेची कारवाई केली.- २०२० ला औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये १२६ लाचखोरांवर गुन्हे नोंदवून लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले.

वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाईतक्रार आल्यावर एसीबीकडुन तातडीने सापळा रचून कारवाई होते. गतवर्षी ४१ ते ५० वयाचे सर्वाधिक लोकसेवक लाच घेताना पकडले गेले हे खरे आहे. आम्ही वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाई करतो. यामुळे लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध नागरिकांनी एसीबीकडे टोल फ्री क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करावी. लाचेची रक्कमही शासनाकडून तक्रारदाराला लगेच परत केली जाते.- डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र एसीबी

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी