शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक दाबला अन् चौघांचे जीवन थांबले; ट्रकमधील लोखंडी प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:51 IST

मध्यप्रदेशातील खाट विकणारे पाच मजूर हे कर्नाटक येथून अवजड लोखंडी प्लेटची वाहतूक करण्याऱ्या ट्रकने गावी परत निघाले होते.

शिऊर/ वैजापूर : चालकाने ब्रेक दाबताच ट्रकमधील सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग अंगावर पडून झाेपलेल्या मध्यप्रदेशातील चार गरीब मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील एका ढाब्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजता घडली. दिवाण मानसिंग गरासिया(वय २४), विजय कंवरलाल गरासिया(वय २१), निर्मल राजुजी गरासिया(वय २१), विक्रम मदनजी कछावा(वय २१, सर्व रा. खडावदा, ता. मनात, जि.नीमच, मध्यप्रदेश) अशी मयतांची नावे आहेत.

सोमवारी मध्यप्रदेशातील खाट विकणारे पाच मजूर हे कर्नाटक येथून मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी अवजड लोखंडी प्लेटची वाहतूक करण्याऱ्या ट्रक(आरजे ०९ जीडी ३८५३) ने जात होते. काम करून थकल्यामुळे सर्व मजूर ट्रकमध्ये गाढ झाेपले होते. छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील एका ढाब्याजवळ रात्री ११ वाजता चालकाने स्पीड ब्रेकर आल्याने अचानक ट्रकचे ब्रेक जोरात दाबले. यामुळे सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग झोपलेल्या मजुरांच्या अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका प्लेटचे वजन २० ते २२ किलो होते. अपघात घडताच वाहन जागेवर सोडून चालक फरार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनि. वैभव रणखांब, पोउनि.चेतन ओगले, गणेश गोरक्ष, सुभाष ठाेके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने मजुरांचे मृतदेह वाहनातून बाहेर काढण्यात आले. शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मजुरांचे मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात ट्रक चालक सुरेश गुर्जर(रा. भिलवाडा, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

केबीनमध्ये थांबला म्हणून वाचलाट्रकमधून प्रवास करणारे पाच मजूर हे झोपण्यासाठी केबीनमधून पाठीमागे झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा ट्रकचालकाने एकाला केबीनमध्ये सोबत थांबण्याची विनंती केली. तसेच झोपण्यासाठीही जागा असल्याचे सांगितले, त्यामुळे अनिल गरासिया हा तेथेच थांबला यामुळे त्याचे प्राण वाचले.

पोटाची खळगी भरण्यासाठी गेले होते कर्नाटकातमयत चार जण हे गरीब कुटुंबातील असून ते खाट विणण्याचा व्यवसाय करुन पोटाची खळगी भरतात. आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी हे पाच जण मध्यप्रदेशाकडे निघाले होते. मात्र वाटेतच त्यातील चार जणांना काळाने हिरावून नेले.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू