शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे मराठी सुधारण्यासाठी झटणारा पुस्तक विक्रेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:54 AM

उर्दू माध्यमातील मुलांनाही उत्तम मराठी यावे यासाठी विशेष उपक्रमांची आखणी

ठळक मुद्देमिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी आखला ३ वर्षाचा कृती आराखडा उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेच्या विकासाचे प्रयत्न

औरंगाबाद : महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर इथल्या प्रत्येकाला मराठी बोलता, लिहिता, वाचता येणे गरजेचेच आहे. महाराष्ट्रात सर्व व्यवहार मराठीतून चालतात, शासन निर्णय मराठीत असतात, तसेच काही शासकीय नोकरीच्या बाबतीत मराठी उमेदवारांना मराठी येणे अनिवार्य असते. नोकऱ्या आणि व्यवहारज्ञान यामध्ये ती मागे पडतात. मात्र उर्दू माध्यमातील मुलांनाही उत्तम मराठी यावे यासाठी औरंगाबादमधील पुस्तक विक्रेते मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी काही वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. 

ग्रामीण भागातील अमराठी मुले उत्तम मराठी बोलतात; पण शहरी भागात मात्र मुस्लिम विद्यार्थी उर्दू माध्यमात शिक्षण घेतात. येथे मुलांना आठवड्यातून केवळ दोन-तीन तास मराठी शिकविली जाते. त्यांचे शिक्षक, पालक, आसपासचे विद्यार्थी हिंदी किंवा उर्दू बोलणारे असतात. त्यामुळे मग या शहरी मुस्लिम मुलांना मराठी शिकविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. यासाठीच अब्दुल नकवी वर्षभर विविध उपक्रम राबवून मुलांमध्ये मराठी विषयाची गोडी लावण्याचा प्रयत्न मिर्झा करत आहेत. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांकडून मराठीतून पत्रे लिहून घेणे, दर्जेदार मराठी बालसाहित्य या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, मराठीतील अनेक पुस्तके विविध उर्दू शाळांमधून वाटप करणे आदी उपक्रम नदवी राबवीत आहेत. 

रिड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनतर्फे अब्दुल नदवी यांनी १२ जून रोजी प्राईम स्टार इंग्लिश हायस्कूल येथे उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास कसा करता येईल, याबाबत विशेष बैठक घेतली. यादरम्यान पुढील बाबी ठरविण्यात आल्या.-- मुलांची मराठी भाषेतील गुणवत्ता वाढावी म्हणून ३ वर्षांचा कृती आराखडा तयार करणे. - प्रत्येक उर्दू शाळेत मराठी दिवस व मराठी पंधरवडा साजरा करणे.- अल्पसंख्याक आयोगातर्फे मराठी फाऊंडेशन योजनेअंतर्गत इयत्ता ५ वीपासून पुढे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक मराठी शिक्षक नेमणे.- मराठी फाऊंडेशन अंतर्गत मराठी भाषेचा अभ्यासक्रम तयार करणे.- उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मराठी शिक्षकांसाठी किमान ६ महिन्यांमध्ये एक कार्यशाळा आयोजित करणे.- मराठी भाषा संवर्धन व विकासाची दिशा ठरविण्यासाठी दि. ६ जुलै रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

कायदा करावा लागणे शरमेचेआपल्याच राज्यात मराठी सक्तीची करण्याविषयी कायदा करावा लागणे आणि त्यासाठी एवढा लढा द्यावा लागणे ही शरमेची बाब आहे. आज अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे की तेथील विद्यार्थ्यांना ना धड मराठी येते, ना हिंदी, ना इंग्रजी. मराठी भाषा कायदा तर झालाच पाहिजे; पण सोबतच मराठीला तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जे अभ्यासक्रम फक्त इंग्रजीतून उपलब्ध आहेत ते मराठीत निर्माण केले पाहिजेत, जेणेकरून लोक मातृभाषेतच शिक्षण घेण्यास प्राधान्य देतील.

मिर्झा नदवी राबवीत असलेले उपक्रमविद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून मिर्झा नदवींमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम :१. दिवाळीच्या आणि उन्हाळी सुटीत उर्दू भाषिकांसाठी खास ‘चला बोलूया मराठीत’ हा उपक्रम ते स्वत:च्या घरीच राबवितात. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाविषयी माहिती देतात.२. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना महापुरुषांविषयीचे मराठी पुस्तक वाचायला देणे.३. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मराठी पुस्तकांचे वाटप४. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मराठी पत्रलेखन स्पर्धा घेतली होती. यामध्ये उर्दू माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि महापौरांना शुद्ध मराठीत २५ हजार पत्रे लिहिली. 

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळाStudentविद्यार्थी