शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

महापालिका निवडणुकीत भाजपचीही स्वबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:17 IST

पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ही भूमिका पोहोचविण्यात आल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

- विकास राऊत 

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांना साडेचार महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्या निवडणुकींच्या राजकीय नियोजनावर राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची ठिणगी पडली आहे. राज्यातील सत्ता समीकरणात शिवसेना-भाजप महायुतीचे सूर जुळो अथवा न जुळो, पालिका निवडणुका युती करून न लढण्याची भूमिका भाजप पदाधिकारी, इच्छुकांनी घेतली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ही भूमिका पोहोचविण्यात आल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले तर मनपा निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे लढतील, असे शिवसेनेने सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपने देखील स्वबळाच्या अनुषंगाने पूर्ण वॉर्डनिहाय सामाजिक आरक्षणांच्या हेतूसह उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सध्या सुरू आहे. प्रभाग रचनेत सोयीनुसार वॉर्डांच्या सीमांची हद्द आखण्यासाठी शिवसेना आणि भाजपतील इच्छुक पालिका निवडणूक विभागावर लक्ष ठेवून आहेत. 

सत्ताधारी असोत किंवा विरोधक प्रभाग रचनेच्या कामांत फारशी लुडबुड करणे शक्य नसते, तरीही सेना, भाजपतील इच्छुकांनी सर्व मार्गांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान बुधवारी पक्षाची मुंबईत संघटन कार्यशाळा होणार आहे. त्या कार्यशाळेत राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे, याबाबत चिंतन होणार आहे. दरम्यान रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपतील पदाधिकाऱ्यांनी पालिकेत स्वबळावर लढल्यास काय स्थिती असेल, याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पूर्व मतदारसंघातही आ. अतुल सावे यांनीही प्रभाग रचनेप्रकरणी आढावा घेतल्याची चर्चा आहे. 

हिंदुत्व हा आता आमचा मुद्दा भाजप महापालिका स्वबळावर लढणार आहे. हिंदुत्व आणि विकास हा आमचा मुद्दा राहील. शिवसेनेचा हिंदुत्व हा मुद्दा आहे की नाही, हे माहिती नाही. हिंदुत्वाच्या मुद्यासह शहरातील विकासकामांची आमची भूमिका काल होती, आजही आहे आणि येणाऱ्या काळातही राहणार आहे. मागील पाच वर्षांत भाजपने शहरातील रस्ते कामांसाह पाणीपुरवठा योजनेला निधी मंजूर करून आणला. हे सर्व कुणी केले, हे जनतेला माहिती आहे. - डॉ. भागवत कराड, अध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळ

आमचीही स्वबळाची तयारी शिवसेना काय करणार, हे माहिती नाही. सेना-भाजप युती मागील अनेक वर्षांपासून पालिकेत सोबत आहे; परंतु आता शिवसेनेची मानसिकता बदलली असेल तर भाजपची स्वबळाची तयारी कालही होती, आजही आणि उद्यादेखील राहील. अजून मनपा निवडणुकीला वेळ आहे. साडेचार महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत राज्यात काहीही होऊ शकते. -शिरीष बोराळकर, प्रवक्ते, भाजपा 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना