शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

महापालिका निवडणुकीत भाजपचीही स्वबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:17 IST

पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ही भूमिका पोहोचविण्यात आल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

- विकास राऊत 

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांना साडेचार महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्या निवडणुकींच्या राजकीय नियोजनावर राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची ठिणगी पडली आहे. राज्यातील सत्ता समीकरणात शिवसेना-भाजप महायुतीचे सूर जुळो अथवा न जुळो, पालिका निवडणुका युती करून न लढण्याची भूमिका भाजप पदाधिकारी, इच्छुकांनी घेतली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ही भूमिका पोहोचविण्यात आल्याचेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले तर मनपा निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे लढतील, असे शिवसेनेने सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपने देखील स्वबळाच्या अनुषंगाने पूर्ण वॉर्डनिहाय सामाजिक आरक्षणांच्या हेतूसह उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सध्या सुरू आहे. प्रभाग रचनेत सोयीनुसार वॉर्डांच्या सीमांची हद्द आखण्यासाठी शिवसेना आणि भाजपतील इच्छुक पालिका निवडणूक विभागावर लक्ष ठेवून आहेत. 

सत्ताधारी असोत किंवा विरोधक प्रभाग रचनेच्या कामांत फारशी लुडबुड करणे शक्य नसते, तरीही सेना, भाजपतील इच्छुकांनी सर्व मार्गांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान बुधवारी पक्षाची मुंबईत संघटन कार्यशाळा होणार आहे. त्या कार्यशाळेत राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे, याबाबत चिंतन होणार आहे. दरम्यान रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपतील पदाधिकाऱ्यांनी पालिकेत स्वबळावर लढल्यास काय स्थिती असेल, याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पूर्व मतदारसंघातही आ. अतुल सावे यांनीही प्रभाग रचनेप्रकरणी आढावा घेतल्याची चर्चा आहे. 

हिंदुत्व हा आता आमचा मुद्दा भाजप महापालिका स्वबळावर लढणार आहे. हिंदुत्व आणि विकास हा आमचा मुद्दा राहील. शिवसेनेचा हिंदुत्व हा मुद्दा आहे की नाही, हे माहिती नाही. हिंदुत्वाच्या मुद्यासह शहरातील विकासकामांची आमची भूमिका काल होती, आजही आहे आणि येणाऱ्या काळातही राहणार आहे. मागील पाच वर्षांत भाजपने शहरातील रस्ते कामांसाह पाणीपुरवठा योजनेला निधी मंजूर करून आणला. हे सर्व कुणी केले, हे जनतेला माहिती आहे. - डॉ. भागवत कराड, अध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळ

आमचीही स्वबळाची तयारी शिवसेना काय करणार, हे माहिती नाही. सेना-भाजप युती मागील अनेक वर्षांपासून पालिकेत सोबत आहे; परंतु आता शिवसेनेची मानसिकता बदलली असेल तर भाजपची स्वबळाची तयारी कालही होती, आजही आणि उद्यादेखील राहील. अजून मनपा निवडणुकीला वेळ आहे. साडेचार महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत राज्यात काहीही होऊ शकते. -शिरीष बोराळकर, प्रवक्ते, भाजपा 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv Senaशिवसेना