शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

देशाकडे पंतप्रधानपदाला पर्याय नव्हता आणि नाही, पण...; राज ठाकरेंनी सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:58 AM

जातीचा माणूस पाहून मतदान होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजपा-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्य खराब करताहेत.

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय काय?, असा प्रश्न हल्ली विचारला जातो. पण, आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होईल, यासाठी आत्तापर्यंत कधीच पर्याय दिले गेले नव्हते. मग ते पंडित नेहरू असोत, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री किंवा राजीव गांधी. यावेळीही आपल्याकडे पंतप्रधानपदाला पर्याय नाही, पण २०१९ मध्ये भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. 

जातीचा माणूस पाहून मतदान होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजपा-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्य खराब करताहेत. हेच सुरू राहिलं, तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल, असा धोकाही त्यांनी वर्तवला. 

मराठवाडा दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे असे... 

>> मोदींना पर्याय काय?... पर्याय कधीपासून शोधायला लागलात तुम्ही?... कोणत्या पंतप्रधानाच्या वेळी तुम्हाला पर्याय होता?

>>नरेंद्र मोदींसारखा एक पंतप्रधान हवा, असं मीच पहिल्यांदा म्हटलं होतं. पण पंतप्रधान झाल्यावर माणूस फिरला. ते बदलल्यावर माझी भूमिका बदलली.

>> आपल्या देशाला पंतप्रधान ठरवण्याचा पर्याय कुठेय?... पण २०१९ ला हे सरकार परत येणार नाही. त्याची रणनीती ठरवेन मी. 

>> मला मराठवाड्याची आठवण येत होती. पण बाकीचे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला आमची आठवण होत नाही.   

>> ज्यांच्या हातात सत्ता दिलीत, त्यांनी तुमची विल्हेवाट लावलीय. राज्याचा सत्यानाश केलाय. 

>> भाजपा ईव्हीएमचा फायदा घेऊन निवडणुका लढवतोय. नाहीतर, उमेदवारांना शून्य मतं कशी मिळू शकतात? नाशिकमध्येही तसाच निकाल आला.

>> नाशिकमध्ये कचराप्रश्नाचं नियोजन पाच वर्षांत करून दाखवलं. इथे २५ वर्षं जे सत्ता करताहेत त्या शिवसेनेला तुम्ही का विचारत नाही?

>> महापालिका खाऊन खाऊन रिकामी करण्यासाठी असते का?

>> माझ्या हातात सत्ता आल्याशिवाय काही करून दाखवू शकणार नाही. 

>> मनसेच्या राज्य कार्यकारिणीत मराठवाड्याला स्थान असेल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMNSमनसेAurangabadऔरंगाबाद