शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्धचा तक्रार अर्ज महिनाभरापासून ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:47 IST

पोलिसांची कारवाई करण्यासाठी टाळाटाळ 

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियानातील घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना अभयडॉ. अमोल गिते यांना निधीचा घोळ निदर्शनास आला.

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) निधी घोटाळ्यातील बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी क्रांतीचौक पोलिसांना तब्बल महिनाभरापासून सवड मिळालेली नाही.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात ‘एनएचएम’मध्ये तत्कालीन कंत्राटी लेखापाल अजय पेरकर याने बँकेतील योजनांचा निधी टप्प्याटप्प्याने स्वत:च्या खात्यावर वळविला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर निधीचा घोळ त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सांगितली. पवनीत कौर यांनी ‘एनएचएम’ अंतर्गत निधीच्या अपहाराचा प्रकार मुंबई येथील आरोग्य विभागाच्या आयुक्तांना सांगितला. आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादला पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तब्बल १८ लाख १६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल चौकशी पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला. 

दरम्यान, २८ जानेवारी रोजी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप प्रशासनावर केला. तेव्हा यासंदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने सभागृहात दिले होते. आरोग्य आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर जि. प. प्रशासनाने जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर या दोन्ही बडतर्फ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून खुलासेही प्राप्त झाले. तत्पूर्वी, कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड यांना वेतन व भत्त्यापोटी २ लाख ३० हजार रुपये देणे होते; परंतु त्यांच्या बँक खात्यावर २३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. नंतर ती रक्कमही बनसोड यांनी ‘एनएचएम’च्या खात्यावर परत जमा केली. या प्रकरणात कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर यांना जबाबदार धरून जिल्हा परिषदेने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. अलीकडे १८ लाखांच्या या अपहारामध्ये कविता बनसोड यांचा सहभाग नसल्यामुळे विधि सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार जि. प. आरोग्य विभागाने अजय पेरकरविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. परंतु महिनाभराचा कालावधी लोटला, तरी अजूनही पोलिसांनी दोषीविरुद्ध कारवाई केलेली नाही.आता आरोग्य विभाग झाला सतर्कजालना रोडवरील एका बँकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे खाते आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निधीची जमा किंवा काढण्यात येणाऱ्या रकमेचे अधिकार आहेत.मात्र, बँकेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर नोंद नसल्यामुळे रकमा जमा केल्या अथवा काढण्यात आल्याचा ‘एसएमएस’ येत नव्हता. आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी बँकेत आपला मोबाईल नंबर नोंद केला आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहाराचे नियमित ‘एसएमएस’ येत असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. पूर्वी ‘एसएमएस’ येत नसल्यामुळे सलग तीन वेळा निधीचा अपहार झाला. आता यापुढे अशा अपहारास पायबंद बसेल, असे डॉ. गिते म्हणाले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचारkranti chowkक्रांती चौकPoliceपोलिस