शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्धचा तक्रार अर्ज महिनाभरापासून ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:47 IST

पोलिसांची कारवाई करण्यासाठी टाळाटाळ 

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियानातील घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना अभयडॉ. अमोल गिते यांना निधीचा घोळ निदर्शनास आला.

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) निधी घोटाळ्यातील बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी क्रांतीचौक पोलिसांना तब्बल महिनाभरापासून सवड मिळालेली नाही.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात ‘एनएचएम’मध्ये तत्कालीन कंत्राटी लेखापाल अजय पेरकर याने बँकेतील योजनांचा निधी टप्प्याटप्प्याने स्वत:च्या खात्यावर वळविला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर निधीचा घोळ त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सांगितली. पवनीत कौर यांनी ‘एनएचएम’ अंतर्गत निधीच्या अपहाराचा प्रकार मुंबई येथील आरोग्य विभागाच्या आयुक्तांना सांगितला. आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादला पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तब्बल १८ लाख १६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल चौकशी पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला. 

दरम्यान, २८ जानेवारी रोजी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप प्रशासनावर केला. तेव्हा यासंदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने सभागृहात दिले होते. आरोग्य आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर जि. प. प्रशासनाने जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर या दोन्ही बडतर्फ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून खुलासेही प्राप्त झाले. तत्पूर्वी, कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड यांना वेतन व भत्त्यापोटी २ लाख ३० हजार रुपये देणे होते; परंतु त्यांच्या बँक खात्यावर २३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. नंतर ती रक्कमही बनसोड यांनी ‘एनएचएम’च्या खात्यावर परत जमा केली. या प्रकरणात कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर यांना जबाबदार धरून जिल्हा परिषदेने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. अलीकडे १८ लाखांच्या या अपहारामध्ये कविता बनसोड यांचा सहभाग नसल्यामुळे विधि सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार जि. प. आरोग्य विभागाने अजय पेरकरविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. परंतु महिनाभराचा कालावधी लोटला, तरी अजूनही पोलिसांनी दोषीविरुद्ध कारवाई केलेली नाही.आता आरोग्य विभाग झाला सतर्कजालना रोडवरील एका बँकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे खाते आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निधीची जमा किंवा काढण्यात येणाऱ्या रकमेचे अधिकार आहेत.मात्र, बँकेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर नोंद नसल्यामुळे रकमा जमा केल्या अथवा काढण्यात आल्याचा ‘एसएमएस’ येत नव्हता. आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी बँकेत आपला मोबाईल नंबर नोंद केला आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहाराचे नियमित ‘एसएमएस’ येत असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. पूर्वी ‘एसएमएस’ येत नसल्यामुळे सलग तीन वेळा निधीचा अपहार झाला. आता यापुढे अशा अपहारास पायबंद बसेल, असे डॉ. गिते म्हणाले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचारkranti chowkक्रांती चौकPoliceपोलिस