शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली

By राम शिनगारे | Updated: January 22, 2025 12:32 IST

राज्य मंडळाने विभागीय मंडळास सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत,मात्र या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे

छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागीय मंडळांसह शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात काळजी घेण्याविषयीचा आदेश काढला. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी, तर दहावीची २१ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचे अभियान राबविण्याचे आदेश दिले . या कॉपीमुक्त अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, नागरिकांना अभियानाची माहिती देणे, विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ देणे, गैरमार्गाचा अवलंब केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे, परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, अभ्यासाच्या तयारीची चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविणे, जनजागृती फेरी काढणे, ग्रामसभा बैठक घेऊन त्यात माहिती देण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शिक्षक, कर्मचाऱ्यांवर आक्षेपपरीक्षा पारदर्शक पणे पार पाडण्यासाठी ज्या शाळेतील विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती इतर शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांंमधून कराव्यात, अशा सूचनाही दिल्या आहेत.

...तर शिक्षक बहिष्कार घालणारकॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यावर अविश्वास दाखविणारी अट रद्द न केल्यास परीक्षेवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाने दिला. याविषयीचे निवेदन विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना दिले. यावेळी महासंघाचे युनूस पटेल, वाल्मीक सुरासे, मनोज पाटील, सुनील जाधव, सुजाता पवार, विजयमाला मोळवणे यांची उपस्थिती होती.

अंमलबजावणी होणारराज्य शासनाने परीक्षेसंदर्भात अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य मंडळाकडून प्राप्त सूचनांची अंमलबजाणी विभागीय मंडळाकडून करण्यात येईल.-अनिल साबळे, अध्यक्ष, विभागीय मंडळ

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर