शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली

By राम शिनगारे | Updated: January 22, 2025 12:32 IST

राज्य मंडळाने विभागीय मंडळास सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत,मात्र या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे

छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागीय मंडळांसह शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात काळजी घेण्याविषयीचा आदेश काढला. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी, तर दहावीची २१ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचे अभियान राबविण्याचे आदेश दिले . या कॉपीमुक्त अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, नागरिकांना अभियानाची माहिती देणे, विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ देणे, गैरमार्गाचा अवलंब केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे, परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, अभ्यासाच्या तयारीची चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविणे, जनजागृती फेरी काढणे, ग्रामसभा बैठक घेऊन त्यात माहिती देण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शिक्षक, कर्मचाऱ्यांवर आक्षेपपरीक्षा पारदर्शक पणे पार पाडण्यासाठी ज्या शाळेतील विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती इतर शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांंमधून कराव्यात, अशा सूचनाही दिल्या आहेत.

...तर शिक्षक बहिष्कार घालणारकॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यावर अविश्वास दाखविणारी अट रद्द न केल्यास परीक्षेवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाने दिला. याविषयीचे निवेदन विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना दिले. यावेळी महासंघाचे युनूस पटेल, वाल्मीक सुरासे, मनोज पाटील, सुनील जाधव, सुजाता पवार, विजयमाला मोळवणे यांची उपस्थिती होती.

अंमलबजावणी होणारराज्य शासनाने परीक्षेसंदर्भात अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य मंडळाकडून प्राप्त सूचनांची अंमलबजाणी विभागीय मंडळाकडून करण्यात येईल.-अनिल साबळे, अध्यक्ष, विभागीय मंडळ

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर