शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

मराठवाड्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा’चा २५ हजार कोटींचा प्रकल्प

By यदू जोशी | Updated: July 31, 2024 11:23 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले.

मुंबई / छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याचे अर्थकारण बदलण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईत बुधवारी परस्पर सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठीचा हा करार असेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले. चारचाकी मोटारींच्या उत्पादनात जगात अव्वल असलेल्या या कंपनीसमोर गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्र, असे गुंतवणुकीसाठीचे तीन पर्याय होते. मात्र, अखेर त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकल्पात पेट्रोल, डिझेल आणि हरित ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे. विशेषत: सहा महिन्यांपासून या प्रकल्पाला गती आली. महाराष्ट्र सरकार आणि कंपनीमध्ये अनेक बैठका झाल्या. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान २० वेळा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरला भेट दिली. संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवली गेली. आता बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अखेर करार होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझू योशिमुरा आणि उपाध्यक्ष मानसी टाटा प्रामुख्याने उपस्थित असतील.

२४ हजार जणांना मिळणार रोजगारछत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी या उद्योगनगरीत एक हजार हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पात ८ हजार जणांना प्रत्यक्ष तर १६ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. या शिवाय, या प्रकल्पाच्या निमित्ताने महत्त्वाच्या ॲन्सिलरिजची (सहायक कंपन्या) उभारणी होईल. २०२७च्या सुरुवातीला या प्रकल्पात पहिली मोटारगाडी तयार होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक या निमित्ताने होणार आहे.

मराठवाड्याचे अर्थकारण बदलेलविदर्भ आणि मराठवाड्याच्या गतिमान विकासासाठी आमच्या सरकारने पुढाकार घेतला आहे. जपानमधील वित्तीय संस्था आणि नामवंत कंपन्यांनी महाराष्ट्राप्रति नेहमीच सहकार्याची भावना बाळगली आहे. त्याचाच परिपाक म्हणून ‘टोयोटा’ची मोठी गुंतवणूक आता छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. मराठवाड्याचे अर्थकारण या प्रकल्पामुळे बदलेल.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीToyotaटोयोटाDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर