शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

महापालिकेच्या सोडतीत एस. टी. प्रवर्गाच्या वार्ड आरक्षणातही मोठा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:25 IST

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिकेला शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एस.टी. प्रवर्गासाठी दोन वॉर्ड आरक्षित करायचे होते.

ठळक मुद्देवॉर्ड रचना करतानाच लोकसंख्येत फेरबदलआक्षेप व हरकतींचा महापालिकेच्या निवडणूक विभागावर पाऊस

औरंगाबाद : महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झालेला असतानाच झारीतील शुक्राचार्यांनी अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) वॉर्ड आरक्षणातही मोठ्या प्रमाणात घोळ केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. नवाबपुरा वॉर्ड एस.टी. प्रवर्गात जाऊ नये म्हणून वॉर्ड रचना तयार करतानाच या वॉर्डातील एस.टी.ची लोकसंख्या कमी करण्यात आली. नवाबपुऱ्यावर आलेले संकट रोजेबाग वॉर्डावर नेण्यात आले.

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिकेला शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एस.टी. प्रवर्गासाठी दोन वॉर्ड आरक्षित करायचे होते. एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या कोणत्या वॉर्डात किती आहे, याचे आकडेही मनपाकडे उपलब्ध होते. उतरत्या क्रमाने दोन वॉर्डांमध्ये आरक्षण टाकायचे होते. लोकसंख्येचा निकष लावला, तर वॉर्ड क्रमांक ३ एकतानगर अनुसूचित जातीसाठी राखीव होण्यास ४५७ लोकसंख्या होती. त्या खालोखाल नवाबपुरा वॉर्डाची लोकसंख्या ४२५ होती. हा वॉर्ड थेट एस.टी. प्रवर्गात जात असल्याचे वॉर्ड रचना तयार करणाऱ्यांच्या लक्षात आले. महापालिकेत पूर्वाश्रमीचा कंत्राटदार असलेल्या एका विद्यमान नगरसेवकाचे या वॉर्डात पुनर्वसन करायचे होते, अशा कठीण परिस्थितीत अधिकारीही मिठाला जागले. त्यांनी नवाबपुरा वॉर्डातील तेलंगवाडा हा परिसर थेट कैसर कॉलनीत टाकला. तेलंगवाडा येथील एस.टी. प्रवर्गाचे मतदान कमी करण्यात आले. नव्याने तयार करण्यात आलेल्या नवाबपुरा वॉर्डात एस.टी.ची लोकसंख्या २०४ वर आणण्यात आली. त्यामुळे हा वॉर्ड आरक्षित होत नव्हता.

अखेर दुसरा कोणता वॉर्ड आरक्षित करायचा यावर मंथन झाले. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोहन भैया मेघावाले यांच्या रोजेबाग वॉर्डात एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या ३२९ होती. त्यामुळे थेट या वॉर्डावर आरक्षण टाकण्यात आले. आता एवढे सर्व ढळढळीत पुरावे उपलब्ध झाल्यानंतरही वॉर्ड रचना, वॉर्ड आरक्षण ‘सब कुछ मॅनेज’नाही, असे म्हणताच येणार नाही. उलट एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण टाकताना मॅनेज कशा पद्धतीने केले होते याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.

सहा किलोमीटरचा कुठे वॉर्ड असतो का...?महापालिकेने तयार केलेल्या नवीन वॉर्ड रचनेवर आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. वॉर्डांच्या सीमा बदलताना निवडणूक आयोगाने दिलेले निर्देशही पाळण्यात आले नाहीत. भीमनगर उत्तर या वॉर्डाला तब्बल सहा किलोमीटर अंतरावर असलेला पहाडसिंगपुरा, हनुमान टेकडी हा भाग जोडण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. सहा किलोमीटरचा कुठे वॉर्ड असतो का? असेही आक्षेपकर्त्याने नमूद केले.माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी दाखल केलेल्या आक्षेपात नमूद केले की, भीमनगर उत्तर या वॉर्डाच्या सीमा जुन्याच पद्धतीने योग्य होत्या. नव्या प्रारूप आराखड्यात या वॉर्डाला हनुमान टेकडी, बीबीका मकबरा पाठीमागील भाग जोडण्यात आला आहे. हे अंतर तब्बल सहा किलोमीटर एवढे आहे. 

रिपाइं आठवले गटातर्फे आक्षेप सादर करण्यात आला आहे. त्यात वॉर्ड क्रमांक ८१ संजयनगरमधून वगळून वॉर्ड क्रमांक ८७ मध्ये जोडण्यात आलेल्या एक ते सहा नंबरच्या गल्ल्या पुन्हा वॉर्ड क्रमांक ८१ मध्ये जोडण्यात याव्यात! राजकीय हस्तक्षेपामुळे या गल्ल्या जोडण्यात आल्या असून, या भागात अनुसूचित जातीचे ९०  टक्के लोक राहतात, असे आक्षेपात नमूद केले आहे. 

सोडत, वॉर्ड रचनेवर २९ आक्षेप दाखलमहापालिका प्रशासनाने तयार केलेली वॉर्ड रचना, सोडतीवर औरंगाबादकर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे तब्बल २९ आक्षेप दाखल झाले आहेत. बुधवारी दिवसभरात सर्वाधिक २३ आक्षेप आले. ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आक्षेपांचा अक्षरश: महापूर येणार हे निश्चित. काही नगरसेवकांनी सोयीचा वॉर्ड तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याची चर्चाही आता मनपात जोर धरत आहे.मंगळवारपासून महापालिकेच्या निवडणूक विभागात आक्षेप व हरकती स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ६ आक्षेप दाखल झाले होते. बुधवारी तब्बल २३ आक्षेप दाखल झाले. वॉर्ड रचना तयार करतानाच विशिष्ट लोकप्रतिनिधी डोळ्यासमोर ठेवून, पुढील महापौर आरक्षण लक्षात घेऊन सोय करण्यात आली आहे. सेना, भाजप, एमआयएम, काँग्रेस पक्षातील काही विद्यमान नगरसेवकांची खास काळजी घेतली आहे. महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांच्या फक्त २० नगरसेवकांसाठी पन्नास टक्क्यांहून अधिक वॉर्ड फोडण्यात आले आहेत.

आयोगाने ८५ सुधारणा कोणत्या केल्यामहापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी राजकीय मंडळींची मर्जी राखण्यासाठी वॉर्ड रचना तयार केली. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यात तब्बल ८५ सुधारणा केल्याची माहिती समोर येत आहे. वॉर्ड रचना, आरक्षण सोडत अंगलट येऊ लागल्याने मनपा प्रशासन आम्ही काहीच केले नाही, सर्व काही आयोगाने केले असे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.

एस. टी. वॉर्डांचा तपशीलवॉर्ड    लोकसंख्या०३-एकतानगर    ४५७१३-रोजेबाग    ३३९४९- नवाबपुरा    २०४४६- नवाबपुरा     ४२५       (जुना वॉर्ड

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक