शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:57 IST

सोमवारी सायंकाळी स्मार्ट सिटीच्या सभागृहात प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

औरंगाबाद : शहरात सध्या पाच दिवसांआड म्हणजेच नागरिकांना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. यामध्ये सुधारणा करीत आता चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय सोमवारी रात्री घेण्यात आला. मरीमाता, पहाडसिंगपुरा आणि जिन्सी जलकुंभ वगळता शहरात सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तीन दिवसांआड पाणी कसे देता येईल, या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार आहे.

सोमवारी सायंकाळी स्मार्ट सिटीच्या सभागृहात प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता एम.बी. काझी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजयसिंग, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन महिन्यांपासून मनपा प्रशासनाने पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी कंबर कसली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मदतीने ४१ कलमी सुधारणा कार्यक्रम सुरू करण्यात आला. हर्सूल तलावातून अतिरिक्त ५ एमएलडी, जायकवाडीतून अतिरिक्त ५ एमएलडी, नहर-ए-अंबरीतून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. टँकर एमआयडीसी, खासगी विहिरींवरून भरण्यास सुरुवात केल्याने पाण्याची बचत होऊ लागली. सोमवारी रात्री बैठकीत सर्वानुमते चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मरीमाता, पहाडसिंगुरा, जिन्सी या जलकुंभावर तूर्त अंमलबजावणी शक्य नाही. तेथे थोडा कालावधी लागेल.

३५० नळ कनेक्शन कटशहरातील मुख्य जलवाहिन्यांवर १३०० अनधिकृत नळ असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले. त्यातील ३५० नळ कापण्यात आल्याची माहिती वाहुळे यांनी बैठकीत दिली. उद्यापासून मनपाच्या नागरी मित्र पथकाचे सैनिक घेऊन नळ खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील आदेशापर्यंत पाणीपुरवठ्याचे कामकाज एम. बी. काझी पाहतील.

गळत्या थांबवा अन्यथा...उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या पथकाने गळत्या थांबविण्यासंदर्भात अहवाल सादर केला. त्यानुसार संबंधित कनिष्ठ अभियंते, उपअभियंते यांना पत्र देण्यात आले. अनेक ठिकाणी कामच झाले नाही. गळत्या थांबल्या नाहीत तर थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या एनर्जी ऑडिटची निविदा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

१०० वॉल्व्हवर अत्याधुनिक यंत्रणाप्रायोगिक तत्त्वावर शहरातील १०० वॉल्व्हवर अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येईल. वॉल्व्ह किती वाजता सुरू व बंद केला, याची माहिती नियंत्रण कक्षाला कळेल. स्मार्ट सिटीच्या जलबेल ॲपला १० हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला. १० जुलैपासून संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे अपडेट यावर पाहायला मिळेल, असे बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी