शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:59 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना धक्कादायक निर्णय, कारण काय? 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगाबाद-मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने उद्धव सेनेला खूप मोठा फटका बसला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यामागे कोणते कारण असावे, ठाकरे सेने आता ऐनवेळी दूसरा कोणता उमेदवार मैदानात उतरवणार याबाबत राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतांश ठिकाणी शिंदे सेना आणि ठाकरे सेना अशी लढत होणार आहे. शहरातील मध्य मतदार संघामध्ये शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर ठाकरे सेनेकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, तनवाणी यांनी कालच उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची रॅली बाजारपेठेत गर्दी होऊन नागरिकांना त्रास होईल असे कारण देत रद्द केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालमित्र आहेत. यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. दोघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. यावेळी देखील प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी आणि एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात आहेत. २०१४ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो. परंतु ते पाठिंबा देण्यास तयार नाहीत. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे उमेदवार तनवाणी यांनी केली. 

गटबाजीमुळे माघार? तनवाणी यांच्या या निर्णया मागे पक्षांतर्गत गटबाजी असल्याची बोलले जात आहे .याविषयी मात्र तनवाणी यांनी भाष्य केले नाही. तर पक्षाकडून देण्यात येणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहू असेही तनवाणी यांनी जाहीर केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीShiv Senaशिवसेना