शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचोर सक्रिय; आठवड्यात १0 गाड्या चोरीस

By admin | Updated: November 24, 2014 12:40 IST

लातूर शहर व परिसरात दुचाकी चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शहर व परिसरातून एक-दोन तरी दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. आठवडाभरात दहा दुचाकींची चोरी झाली.

लातूर : लातूर शहर व परिसरात दुचाकी चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शहर व परिसरातून एक-दोन तरी दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. आठवडाभरात दहा दुचाकींची चोरी झाली. परंतु, लातूरच्या पोलीस प्रशासनाला अद्यापपर्यंत एकाही दुचाकीचोरास पकडण्यात यश आले नाही. 
लातूर शहरात दिवसाकाठी एक-दोन दुचाकींची तरी चोरी होतच आहे. रविवारी शहरातील विशाल नगर भागातील हणमंत माधवराव शिंदे यांच्या एमएच २४ डब्ल्यू ११२३ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील पद्मा नगर भागातील सुरेश भास्कर यांनी स्वत:च्या घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच 0४ बीई ७२0८ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. तसेच शहरातील जुनी रेल्वे लाईन भागातील परिसरात अमोल निनगुरकर यांची एमएच २४-२७१३ ही दुचाकी मंगळवारी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद आहे. 
शहरातील बाश्री रोडवरील चाणक्य सोसायटीमध्ये शनिवारी पार्किंग केलेल्या बंडू स्वामी यांची दुचाकी चोरीस गेली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच शहरातील जुना औसा रोड भागातील सद्गुरु नगरमध्ये राहणार्‍या रामकृष्ण फड यांच्या एमएच २४-९७४३ या दुचाकीची चोरी झाली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल. तर मंगेश झुंजे यांची एमएच २६ ई ८८१४ या दुचाकीची शिवाजी चौकातून चोरी झाली. या प्रकरणी झुंजे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद झाली आहे. अशा पद्धतीने दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. नव्या पोलिस अधीक्षकांना दुचाकी चोरट्यांनी जणू आव्हानच दिले आहे. (प्रतिनिधी) ■ आठवडाभरात चोरीचा आकडा दहा दुचाकींपर्यंत गेला आहे. तरीही यातील एकाही दुचाकी चोरास पकडण्यास शहर व जिल्हा पोलीस प्रशासनाला यश आले नाही. यामुळे दुचाकी वाहनतळावर तसेच घरासमोर दुचाकी पार्किंग करावी की नाही, असा प्रश्न पडला आहे. नूतन पोलीस अधीक्षक ज्ञानेश्‍वर चव्हाण यांनी २४ तास नाकाबंदी लावली आहे. दोन दिवस उलटूनही या नाकाबंदीतून दुचाकीचोर पोलिसांच्या नजरेस आले नाहीत.