शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

'अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाचे उदाहरण',औरंगाबाद खंडपीठाकडून महावितरणला ५ लाख रुपये ‘कॉस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 16:18 IST

Aurangabad High Cpourt : याचिकाकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला असता विद्युत वितरण कंपनीने ६ महिन्यांत टॉवर हटवावा आणि पर्यायी रस्ता तयार करावा, असा आदेश २०१६ ला दिला होता.

ठळक मुद्देप्रतिवादींचे जिल्हाधिकारी, एमईआरसीच्या आदेशांकडे दुर्लक्ष

औरंगाबाद : महावितरण अधिकाऱ्यांच्या मनमानीपणामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि वारंवार कराव्या लागलेल्या कोर्ट कचेऱ्यांमुळे पक्षकाराला तब्बल पाच वर्षे त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल या महावितरणचे मुख्य तसेच कार्यकारी अभियंत्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत ५ लाख रुपये ‘कॉस्ट’ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जमा करावेत, असा आदेश न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी दिला आहे.

त्याचप्रमाणे वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील ‘निलंगा तालीखेड’ रस्त्यावरील सर्व्हे नंबर १७१ मधील विद्युत वितरण टॉवर क्रमांक २ च्या दक्षिणेकडील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सहा महिन्यांत सुरू करावी. यासाठीचा प्रस्ताव १५ ऑक्टोबरपूर्वी सक्षम यंत्रणेकडे पाठवावा, असाही आदेश खंडपीठाने दिला आहे. डॉ. हिरालाल गणपत निंबाळकर यांनी ॲड. ए. एन. अन्सारी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार निलंगा येथील सर्व्हे नंबर १७१ मधील ४ एकर ३ गुंठे जमीन त्यांच्या आणि त्यांचे भाऊ अजित यांच्या संयुक्त मालकीची आहे. त्यापैकी निलंगा तालीखेड रस्त्यावरील विद्युत वितरण कंपनीचा १३२ के.व्ही. चा टॉवर क्रमांक २ हा अजित यांच्या वाट्याच्या जमिनीत आहे. त्यामुळे ग्रामस्थ नजीकच्या जमिनीतून ये-जा करतात. परिणामी सुमारे अर्धा एकर जमिनीचा २०१२ पासून याचिकाकर्त्याला उपभोग घेता येत नाही.

हेही वाचा - मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

याचिकाकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला असता विद्युत वितरण कंपनीने ६ महिन्यांत टॉवर हटवावा आणि पर्यायी रस्ता तयार करावा, असा आदेश २०१६ ला दिला होता. प्रतिवाद्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी रेग्युलेटरी कमिशन (एमईआरसी) कडे धाव घेतली असता, टॉवर हटविणे योग्य नसल्याचे मतप्रदर्शन करून टॉवर हटविण्यापुरता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश एमईआरसीने रद्द केला. मात्र, पर्यायी रस्त्याबाबत हस्तक्षेपास नकार दिला होता. त्यानंतर प्रतिवादींनी केेलेला पुनर्विलोकन अर्ज सुद्धा एमईआरसीने फेटाळला होता. असे असताना प्रतिवादींनी जिल्हाधिकारी आणि एमईआरसीच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पक्षकारांना खंडपीठात यावे लागले होते.

अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाचे उत्तम उदाहरणयाचिकाकर्त्यांला २०१२ ते २०१७ दरम्यान ५ वर्षे वादग्रस्त जमिनीचा शेतीसाठी उपयोग करता आला नाही. त्यानंतर २०१७ ला बिनशेतीची (एन.ए.) परवानगी मिळूनही २०१७ ते २०२१ पर्यंत ती जमीन विकता आली नाही किंवा बिनशेती म्हणून तिचा उपभोग याचिकाकर्त्यांला घेता आला नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.

हेही वाचा - नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद