शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

'सुरुवात मायबोलीत...'; मुक्तीसंग्राम दिनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मराठीत दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:20 IST

न्यायायाधीश, वकिलांनी समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा; सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांचे आग्रही प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : भाषणाची सुरुवात मायबोलीत करतो असे म्हणत सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांनी मराठवाड्यातील संत, स्वातंत्र्यसैनिक आणि येथील समृद्धीचा उल्ल्खेख करत अस्खलित मराठीत मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच  सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हा न्याय व्यवस्थेचा मूळ उद्देश आहे. घटनाकारांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सद्सद विवेक बुद्धीला अनुसरून, न्यायाधीश आणि वकिलांनी याेग्य समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आग्रही प्रतिपादन सरन्यायाधीश डाॅ. चंद्रचूड यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च न्यायालय प्रशानाच्या वतीने एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात आयाेजित कार्यक्रमात सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय न्या. अभय ओक आणि न्या. दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला, औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठतम न्यायमूर्ती रवींद्र घुगे, ॲडव्हाेकेट जनरल डाॅ. बिरेंद्र सराफ, बार काैन्सिलचे उपाध्यक्ष उदय वारुंजीकर, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष नरसिंग जाधव व सचिव राधाकृष्ण इंगाेले यांची मंचावर उपस्थिती हाेती.

समृद्धी सचिन कुलकर्णी हिने स्वागत गीत गायले. ॲड. चैतन्य धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी आभार मानले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर आणि गोवा खंडपीठातील न्यायमूर्ती, ज्येष्ठ विधिज्ञ, वकील आणि विधि शाखेचे विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

भाषणाची सुरुवात केली मराठीत‘न्याय व्यवस्था बळकट करण्यासाठी वकील आणि न्यायधीशांमध्ये समन्वय वाढविणे’ या विषयाची मांडणी करताना प्रारंभी न्या. चंद्रचूड यांनी मायबोलीत भाषणाची सुरुवात केली. मराठवाड्यातील संत परंपरेचा, ज्याेतिर्लिंगाचा उल्लेख करीत मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यवीरांना व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या त्यागाच्या निष्ठेचे फळ आपण आज स्वातंत्र्याच्या रूपाने चाखताे आहोत, असे ते म्हणाले.

न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरजते म्हणाले की, न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारा प्रत्येक घटक न्यायव्यवस्थेचा अविभाज्य अंग आहे. वकील आणि न्यायमूर्तींनी परस्परांचा सन्मान करावा. काेणतेही काम करताना ते सद्सदविवेक बुद्धीला स्मरून केले तर उद्दिष्टपूर्ती हाेते. हाच नियम न्यायव्यवस्थेलाही लागू पडताे. न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे सुमारे ३६ हजार निवाडे ‘ ईएसईआर’प्रणालीवर मराठीसह देशाच्या विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ वकिलांनी घ्यावा. तसेच ई-फायलिंग, ई-सेवा केंद्र आणि विधि विद्यापीठे ही विधि शिक्षणाची आवश्यक अंग आहेत.

विश्वासार्हता हा न्याय व्यवस्थेचा आत्मातरुण वकील व्यवसायात येत आहे. त्यांना वरिष्ठ वकिलांनी वेळाेवेळी मार्गदर्शन करावे. विधि विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य करून तरुण वकिलांना प्रशिक्षित करावे. न्याय व्यवस्थेत जवळपास ५० टक्के महिला वकील आहेत. त्यांना आवश्यक त्या साेयी-सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. तरुण वकिलांचा दृष्टिकाेन व्यापक, वैविध्यपूर्ण व सर्वसमावेशक असावा. काळा काेट व गाऊन प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची आठवण करून देताे. विश्वासार्हता हा न्याय व्यवस्थेचा आत्मा आहे याचे स्मरण ठेवा, असे ते शेवटी म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा