तलाठ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात
By Admin | Updated: April 27, 2016 00:38 IST2016-04-27T00:06:19+5:302016-04-27T00:38:32+5:30
औरंगाबाद : तलाठ्यांच्या बेमुदत संपाला मंगळवारपासून सुरुवात झाली. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला आज दिवसभर कुलूप होते.

तलाठ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात
औरंगाबाद : तलाठ्यांच्या बेमुदत संपाला मंगळवारपासून सुरुवात झाली. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला आज दिवसभर कुलूप होते. कार्यालयाच्या चाव्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून तलाठी, मंडळ अधिकारी संपावर गेले. या संपामुळे महसूल कामांचा खोळंबा होण्यास सुरुवात झाली आहे.
१२ हजार ६३७ तलाठी आणि २१०० मंडळाधिकारी, ४०० नायब तहसीलदार संपात सहभागी झाले आहेत. राज्यात ३ हजार ८४ स. जा. वाढविणे, आॅनलाईन सातबारा योजनेतील सॉफ्टवेअर बदलण्यासह तलाठ्यांना पायाभूत सुविधा पुरविणे, तलाठी कार्यालय बांधणे, या तीन मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या तरच संप मागे घेण्याचा विचार होणार आहे, असे महासंघाचे सरचिटणीस सतीश तुपे, तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी, रिता पुरी आदींनी कळविले आहे.