शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रवेशबंदीचा वेळ संपताच बीड बायपास बनला अधिक धोकादायक; पुढे जाण्यासाठी जडवाहनचालकांमध्ये लागली स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:23 IST

बीड बायपासवरील प्रवेशबंदीचा वेळ संपताच ट्रक, हायवासह अन्य अवजड वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू होते.

ठळक मुद्देबीड बायपासवर महिनाभरात अपघातात पाच जणांचे बळी गेले.जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रवेशबंदी केली. ११ वाजेनंतर जडवाहनांसाठी  मार्ग खुला होताच जडवाहनचालकांनी वाहने वेगात दामटली.

औरंगाबाद : बीड बायपासवरील प्रवेशबंदीचा वेळ संपताच ट्रक, हायवासह अन्य अवजड वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. अन्य वाहनचालकांसाठी ते रस्ताच सोडत नसल्याने या मार्गावरील अपघाताचा धोका वाढल्याचे सोमवारी दिसून आले. विशेष म्हणजे बायपासवरील सुसाट राँगसाईड वाहनचालकांची संख्या ‘जैसे थे’ आहे.

बीड बायपासवर महिनाभरात अपघातात पाच जणांचे बळी गेले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी २ ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रवेशबंदी केली. प्रवेशबंदीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत दोन्ही बाजूंनी पोलिसांनी अवजड वाहने रोखली. ११ वाजेनंतर जडवाहनांसाठी  मार्ग खुला होताच जडवाहनचालकांनी वाहने वेगात दामटली. या रस्त्यावरील दोन्ही लेनचा ताबा घेत जडवाहनचालकांमध्ये पुढे निघण्याची स्पर्धाच सुरू झाली.

या स्पर्धेत जडवाहनचालक अन्य वाहनांसाठी लेनच शिल्लक ठेवत नाही, परिणामी दुचाकीस्वार आणि कार, रिक्षासारखे छोटे वाहनचालक जीव धोक्यात घालून दोन वाहनांमधील अरुंद फटीतून पुढे निघण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सोमवारी सदर प्रतिनिधीला आढळले. बीड बायपास रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन केल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर यांनी रविवारी आणि सोमवारीही बायपासची पाहणी केली. वाहतूक व्यवस्थेत काय फरक पडला, तेथील बेशिस्त आणि राँगसाईड वाहनचालकांवर कारवाईचे आदेश त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले. यावेळी पोलीस निरीक्षक भारत काकडे, अशोक मुदिराज आणि हेमंत गुरमे यांची उपस्थिती होती. 

दोन्ही बाजूने दुपारी अडीचपर्यंत वाहनांच्या रांगासकाळी रोखलेली वाहतूक पुढे बीड बायपासवरून जाण्यासाठी तब्बल तीन तास लागले. झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम चौक आणि लिंक रोड ते झाल्टा फाटा या दोन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत जडवाहने रांगेत धावत होती. तेव्हा दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून वाहने चालवीत होते. २ वाजेनंतर बीड बायपासवरील जडवाहनांची संख्या कमी झाली. मग रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

राँगसाईड सुसाटबीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र अधिसूचना काढून जडवाहनांना प्रवेशबंदी केली. असे असताना या मार्गावरील राँगसाईड वाहने पळविणाऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट राँगसाईड सुसाट वाहने पळविणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. यात रिक्षाचालक, दुचाकीचालकांसोबत चारचाकी कारचालकही दिसले. राँगसाईड वाहनचालकांवर सकाळी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई  केली.

वेग कमी करण्यासाठी लावले बॅरिकेडस् बीड बायपासवर ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावले आहेत. यामुळे वाहनचालकांना वेग कमी करून झिग-झॅग पद्धतीने वाहन पुढे न्यावे लागते आणि अपघात टळतो. अपघातप्रवण ठिकाणीच हे बॅरिकेडस् लावण्यात आले.- भारत काकडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू