शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

पेरते व्हा; पण पुरेशा पावसानंतर; जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:57 PM

खरिपाच्या पेरणीसाठी साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. खरिपाच्या पेरणीसाठी साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

गेल्या वर्षात बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या पार्श्वभूमीवर जि.प. कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, बाजारात बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीसाठी तयार असली, तरी त्याला पावसाअभावी अद्यापही पाहिजे तसा उठाव नाही. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय प्रामुख्याने कापसाची लागवड करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनाही पाऊस पडल्यानंतरच कपाशीच्या बियाणांची विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. ज्या बियाणांना विक्रीची मान्यता आहे, अशाच बियाणांची विक्री करावी. मान्यता नसलेल्या कंपन्यांच्या आमिषांना बळी पडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत होते; परंतु अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहे. जिल्ह्यात कापूस, मका, उडीद, मूग आदींची पेरणी रखडली आहे. मागील वर्षात झालेला बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहता यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास ३० हजार हेक्टर घट अपेक्षित आहे.जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे असून, गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ती ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र एवढी अपेक्षित आहे.

यंदा खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र असेयंदा खरीप हंगामात लागवडीचे सरासरी क्षेत्र ७ लाख २० हजार हेक्टर एवढे निश्चित करण्यात आले आहे.गेल्या वर्षी ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र. गेल्या वर्षी ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड. यंदा १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद