शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

बाळासाहेबांचा आदर्श राज ठाकरेंच्यासमोर; त्यांच्या खांद्यावर खेळून ते मोठे झाले- बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:02 IST

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली.

औरंगाबाद- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्यावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन सभेला नक्कीच परवानगी देतील, असं  बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. पोलिसांना आम्ही सहकार्य करु, असंही त्यांनी सांगितलं. तसेच बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श राज ठाकरेंच्या समोर आहे. त्यांच्याच खांद्यावर खेळून राज ठाकरे मोठे झाले. मात्र बाळासाहेब हे बाळासाहेब आहेत आणि राज ठाकरे हे राज ठाकरे आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले. 

मनसेच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू झाल्याचे वृत्त आले होते. मात्र औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी काल दिली होती. औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलं होतं. हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. 

महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमातून त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. माझी त्यांना विनंती आहे, की त्यांनी इतिहास समजून घ्यावा, असं शरद पवार सभेतील भाषणात म्हणाले.

परवा एका नेत्याने मुंबईत भाषण दिलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की, शरद पवार हे सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूराजे यांचेच नाव का घेतात, असं म्हणत माझी विनंती आहे त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राचे सामाजिक परिवर्तन यासंबंधी अतिशय उत्तम लेखन केलं. ते जर वाचलं, तर अशा प्रकारचे प्रश्न कोणी विचारणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरAurangabadऔरंगाबाद