शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

शहरातून प्रतिदिन सरासरी तीन वाहनांची होतेय चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:47 IST

गुन्हे उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प

ठळक मुद्देगतवर्षीपेक्षा यंदा वाहन चोऱ्या वाढल्यागरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी 

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहरात वाहन चोऱ्यांचे प्रमाण ६ महिन्यांपासून वाढल्याचे दिसते आहे. औरंगाबाद शहरातून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरटे पळवीत आहेत. वाढत्या वाहन चोऱ्यांचा थेट फटका मध्यमवर्गीय आणि गरिबांना बसत आहे. वाहन चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे आणि त्यांच्या चल, अचल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १७ ठाणे आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. एवढे मोठे पोलीस बल असताना गतवर्षीच्या तुलनेत शहरातील वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 

मागील ६ महिन्यांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांतून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरीला जात आहेत. यात सर्वाधिक  दुचाकी आहेत. गतवर्षी २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ७४५ वाहने चोरीला गेल्याची नोंद झाली होती. त्यापैकी केवळ १६९ वाहने चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र वाहन चोरी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसतेय. 

यावर्षी जानेवारी ते जूनअखेरपर्यंत तब्बल ४५० वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत, तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत हा आकडा ३०५ एवढा होता. गतवर्षी याच कालावधीत चोरीला गेलेल्या वाहनांची संख्या १८० होती. गतवर्षी एप्रिलमध्ये ५२ वाहने चोरीला गेली, तर यावर्षी हा आकडा ७५ वर पोहोचला. 

गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी सार्वजनिक वाहतुकीची अपुरी व्यवस्था आणि रिक्षाचा महागलेला प्रवास परवडत नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांना दुचाकी बाळगणे अनिवार्यच झाले आहे. कर्ज घेऊन अथवा पोटाला चिमटा घेऊन जमविलेल्या पैशातून मोटारसायकल खरेदी केली जाते. यात काही जण नवीन तर काही लोक जुनी दुचाकी खरेदी करतात. 

मोठे पोलीस बल तरीही वाहन चोऱ्या वाढल्याशहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, स्वतंत्र गुन्हे शाखा, १७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत; परंतु सिडको, एमआयडीसी सिडको आणि गुन्हे शाखेकडून गुन्हे उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अन्य ठाणेदार केवळ गुन्ह्याची नोंद घेऊन मोकळे होतात, असे दिसते. परिणामी, वाहन चोऱ्यांना ब्रेक लावणे दिवसेंदिवस अशक्यच होत आहे.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस