शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

शहरातून प्रतिदिन सरासरी तीन वाहनांची होतेय चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:47 IST

गुन्हे उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प

ठळक मुद्देगतवर्षीपेक्षा यंदा वाहन चोऱ्या वाढल्यागरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी 

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहरात वाहन चोऱ्यांचे प्रमाण ६ महिन्यांपासून वाढल्याचे दिसते आहे. औरंगाबाद शहरातून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरटे पळवीत आहेत. वाढत्या वाहन चोऱ्यांचा थेट फटका मध्यमवर्गीय आणि गरिबांना बसत आहे. वाहन चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे आणि त्यांच्या चल, अचल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १७ ठाणे आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. एवढे मोठे पोलीस बल असताना गतवर्षीच्या तुलनेत शहरातील वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 

मागील ६ महिन्यांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांतून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरीला जात आहेत. यात सर्वाधिक  दुचाकी आहेत. गतवर्षी २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ७४५ वाहने चोरीला गेल्याची नोंद झाली होती. त्यापैकी केवळ १६९ वाहने चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र वाहन चोरी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसतेय. 

यावर्षी जानेवारी ते जूनअखेरपर्यंत तब्बल ४५० वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत, तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत हा आकडा ३०५ एवढा होता. गतवर्षी याच कालावधीत चोरीला गेलेल्या वाहनांची संख्या १८० होती. गतवर्षी एप्रिलमध्ये ५२ वाहने चोरीला गेली, तर यावर्षी हा आकडा ७५ वर पोहोचला. 

गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी सार्वजनिक वाहतुकीची अपुरी व्यवस्था आणि रिक्षाचा महागलेला प्रवास परवडत नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांना दुचाकी बाळगणे अनिवार्यच झाले आहे. कर्ज घेऊन अथवा पोटाला चिमटा घेऊन जमविलेल्या पैशातून मोटारसायकल खरेदी केली जाते. यात काही जण नवीन तर काही लोक जुनी दुचाकी खरेदी करतात. 

मोठे पोलीस बल तरीही वाहन चोऱ्या वाढल्याशहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, स्वतंत्र गुन्हे शाखा, १७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत; परंतु सिडको, एमआयडीसी सिडको आणि गुन्हे शाखेकडून गुन्हे उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अन्य ठाणेदार केवळ गुन्ह्याची नोंद घेऊन मोकळे होतात, असे दिसते. परिणामी, वाहन चोऱ्यांना ब्रेक लावणे दिवसेंदिवस अशक्यच होत आहे.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस