शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

औरंगाबादचा ओला कचरा नारेगावात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्त : आता शहरात कुठेही कचरा पडून राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेनारेगाव कचरा डेपोत कचरा टाकण्यास मनाई केली होती. या निर्णयाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बुधवारी या याचिकेवर अंतिम निर्णय देण्यात आला. दरम्यान, पत्रकारांसोबत बोलताना राम म्हणाले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात जागेचा मोठा प्रश्न आहे. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोठेही कचºयावर प्रक्रिया करण्यात येईल. यासंदर्भात अंतिम निर्णय शासनाने नेमलेल्या समितीला घ्यावा लागणार आहे. राज्य शासनाने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी डीपीआरला मंजुरी दिली. यानुसार पुढील तीन महिन्यांत यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येईल.यापूर्वीही मनपाला नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत दिली होती. तेव्हा मनपाने काहीच केले नाही, या थेट प्रश्नावर महापौरांनी हस्तक्षेप करीत नमूद केले की, तेव्हा आमच्याकडे डीपीआर मंजूर नव्हता. आता ८० कोटींचा डीपीआर मंजूर आहे. ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. आता सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला असला तरी महापालिकेची यंत्रणा स्वस्थ बसणार नाही. उलट जोमाने काम करणार आहे.शहरात इंदौरचे प्रतिबिंब दिसेलशहरात ४०० मेट्रिक टन कचरा निघतो. आमच्या यंत्रणेत काम करणाºया एखाद्या कर्मचाºयाने चुकीच्या पद्धतीने कुठे कचरा नष्ट केला, तर त्यावर निश्चित कारवाई होईल. येणाºया काही दिवसांमध्ये औरंगाबादचा निश्चित कायापालट होणार आहे. इंदौर शहराचे प्रतिबिंब येथे दिसेल, असा दृढविश्वास प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.संपूर्ण शहरावर हे संकटकचºयाचा प्रश्न मनपाशी निगडित आहे. या जबाबदारीतून मनपा कधीच पळणार नाही. मात्र, ही समस्या पूर्ण शहराची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून मदतीसाठी पुढे आले पाहिजे. सर्वांच्या सहकार्यामुळेच शहर स्वच्छ व सुंदर होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ