शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा ओला कचरा नारेगावात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्त : आता शहरात कुठेही कचरा पडून राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेनारेगाव कचरा डेपोत कचरा टाकण्यास मनाई केली होती. या निर्णयाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बुधवारी या याचिकेवर अंतिम निर्णय देण्यात आला. दरम्यान, पत्रकारांसोबत बोलताना राम म्हणाले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात जागेचा मोठा प्रश्न आहे. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोठेही कचºयावर प्रक्रिया करण्यात येईल. यासंदर्भात अंतिम निर्णय शासनाने नेमलेल्या समितीला घ्यावा लागणार आहे. राज्य शासनाने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी डीपीआरला मंजुरी दिली. यानुसार पुढील तीन महिन्यांत यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येईल.यापूर्वीही मनपाला नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत दिली होती. तेव्हा मनपाने काहीच केले नाही, या थेट प्रश्नावर महापौरांनी हस्तक्षेप करीत नमूद केले की, तेव्हा आमच्याकडे डीपीआर मंजूर नव्हता. आता ८० कोटींचा डीपीआर मंजूर आहे. ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. आता सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला असला तरी महापालिकेची यंत्रणा स्वस्थ बसणार नाही. उलट जोमाने काम करणार आहे.शहरात इंदौरचे प्रतिबिंब दिसेलशहरात ४०० मेट्रिक टन कचरा निघतो. आमच्या यंत्रणेत काम करणाºया एखाद्या कर्मचाºयाने चुकीच्या पद्धतीने कुठे कचरा नष्ट केला, तर त्यावर निश्चित कारवाई होईल. येणाºया काही दिवसांमध्ये औरंगाबादचा निश्चित कायापालट होणार आहे. इंदौर शहराचे प्रतिबिंब येथे दिसेल, असा दृढविश्वास प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.संपूर्ण शहरावर हे संकटकचºयाचा प्रश्न मनपाशी निगडित आहे. या जबाबदारीतून मनपा कधीच पळणार नाही. मात्र, ही समस्या पूर्ण शहराची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून मदतीसाठी पुढे आले पाहिजे. सर्वांच्या सहकार्यामुळेच शहर स्वच्छ व सुंदर होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ