शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

औरंगाबादचा ओला कचरा नारेगावात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्त : आता शहरात कुठेही कचरा पडून राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेनारेगाव कचरा डेपोत कचरा टाकण्यास मनाई केली होती. या निर्णयाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बुधवारी या याचिकेवर अंतिम निर्णय देण्यात आला. दरम्यान, पत्रकारांसोबत बोलताना राम म्हणाले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात जागेचा मोठा प्रश्न आहे. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोठेही कचºयावर प्रक्रिया करण्यात येईल. यासंदर्भात अंतिम निर्णय शासनाने नेमलेल्या समितीला घ्यावा लागणार आहे. राज्य शासनाने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी डीपीआरला मंजुरी दिली. यानुसार पुढील तीन महिन्यांत यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येईल.यापूर्वीही मनपाला नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत दिली होती. तेव्हा मनपाने काहीच केले नाही, या थेट प्रश्नावर महापौरांनी हस्तक्षेप करीत नमूद केले की, तेव्हा आमच्याकडे डीपीआर मंजूर नव्हता. आता ८० कोटींचा डीपीआर मंजूर आहे. ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. आता सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला असला तरी महापालिकेची यंत्रणा स्वस्थ बसणार नाही. उलट जोमाने काम करणार आहे.शहरात इंदौरचे प्रतिबिंब दिसेलशहरात ४०० मेट्रिक टन कचरा निघतो. आमच्या यंत्रणेत काम करणाºया एखाद्या कर्मचाºयाने चुकीच्या पद्धतीने कुठे कचरा नष्ट केला, तर त्यावर निश्चित कारवाई होईल. येणाºया काही दिवसांमध्ये औरंगाबादचा निश्चित कायापालट होणार आहे. इंदौर शहराचे प्रतिबिंब येथे दिसेल, असा दृढविश्वास प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.संपूर्ण शहरावर हे संकटकचºयाचा प्रश्न मनपाशी निगडित आहे. या जबाबदारीतून मनपा कधीच पळणार नाही. मात्र, ही समस्या पूर्ण शहराची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून मदतीसाठी पुढे आले पाहिजे. सर्वांच्या सहकार्यामुळेच शहर स्वच्छ व सुंदर होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नSupreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपोAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ