शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

औरंगाबादमधील तब्बल १,४९६ प्रदूषणकारी कंपन्या आल्या ‘एमआयडीसी’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:06 IST

एमआयडीसीने एक परिपत्रक जारी केले असून, या कंपन्यांना विस्तार करावयाचा असल्यास आपले उत्सर्जन कमी करून नियमित पातळीवर आणावे लागेल

ठळक मुद्देउत्सर्जन कमी कराअन्यथा विस्तारालाही संमती नाही

औरंगाबाद : जिल्ह्यातील १,४९६ कंपन्या प्रचंड प्रदूषण पसरवीत असल्याचे समोर आले असून, या कंपन्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रडारवर आल्या आहेत. एमआयडीसीने एक परिपत्रक जारी केले असून, या कंपन्यांना विस्तार करावयाचा असल्यास आपले उत्सर्जन कमी करून नियमित पातळीवर आणावे लागेल, असे म्हटले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जारी केलेल्या देशातील १00 अतिप्रदूषित क्षेत्रांच्या (एरिया) २0१७-१८ च्या यादीत औरंगाबाद अतिप्रदूषित (सीव्हिअरली पोल्युटेड) श्रेणीत येते. सर्वंकष ‘पर्यावरण प्रदूषण निर्देशांका’त (सीईपीआय) औरंगाबादला ६९.८५ गुण मिळाले आहेत. प्रदूषणाची तीव्र पातळी हे गुण दर्शवितात. औरंगाबादेतील १,४९६ कंपन्या लाल (६0पेक्षा अधिक गुण) आणि नारंगी (४१पेक्षा अधिक गुण) श्रेणीत येतात, असे एमआयडीसीच्या परिपत्रकात म्हटले आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले की, २ जानेवारी रोजी एमआयडीसीच्या सीईओंनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लाल व  नारंगी श्रेणीतील कंपन्यांचा विस्तार निगराणीखाली आहे. या कंपन्यांना विस्तार करायचा असल्यास नियमांचे पालन करावे लागेल. प्रदूषणाची पातळी खाली आणावी लागेल.

औरंगाबादेतील ४,७६५ कंपन्यांवर प्रदूषण विभागाकडून नियंत्रण ठेवण्यात येते. त्यातील एकूण १,४९६ कंपन्या तीव्र प्रदूषण करणाऱ्या आहेत. त्यांना लाल व नारंगी रंगाची श्रेणी देण्यात आली आहे. ८६७ कंपन्या लाल श्रेणीत, तर ६२९ कंपन्या नारंगी श्रेणीत आहेत. ३,२३४ कंपन्या हरित श्रेणीत (सीईपीआय गुण २१ ते ४0) आणि ३५ कंपन्या शुभ्र श्रेणीत (सीईपीआय गुण २0च्या आत) येतात. हरित आणि शुभ्र श्रेणी प्रदूषण न करणाऱ्या कंपन्यांची समजली जाते.‘मराठवाडा एन्व्हायरन्मेंटल केअर क्लस्टर’चे (एमईसीसी) संस्थापक अध्यक्ष आणि स्थानिक उद्योजक बी. एस. खोसे यांनी सांगितले की, ज्या कंपन्या प्रदूषण करीत आहेत, त्यांना शोधून दंड करायला हवा. ज्या कंपन्या प्रदूषण करीत नाहीत, त्यांना जबाबदार धरता कामा नये.

सूचनांची अंमलबजावणी करीत आहोत :‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर’चे (सीएमआयए) उपाध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, या समस्येबाबत सरकारी संस्थांकडून आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. औरंगाबादेतील कंपन्या त्यावर काम करीत आहेत.

महाराष्ट्रात नऊ क्षेत्रे अतिप्रदूषितएमआयडीसीच्या परिपत्रकानुसार, देशातील १00 अतिप्रदूषित क्षेत्रांच्या यादीत नऊ क्षेत्रे महाराष्ट्रातील आहेत. 

ही नऊ क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत :तारापूर (सीईपीआय गुण ९३.६९)चंद्रपूर (सीईपीआय गुण ७६.४१)औरंगाबाद  (सीईपीआय गुण ६९.८५)डोंबिवली (सीईपीआय गुण ६९.६७)नाशिक (सीईपीआय गुण ६९.४९)नवी मुंबई (सीईपीआय गुण ६६.३२)चेंबूर (सीईपीआय गुण ५४.६७)पिंपरी-चिंचवड (सीईपीआय गुण ५२.१५)महाड (सीईपीआय गुण ४७.१२)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpollutionप्रदूषणMIDCएमआयडीसी