शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबादकरांची तहान भागणार; मनपा एमआयडीसी, हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:04 IST

‘लोकमत’इफेक्ट : हर्सूल तलावातून ६, एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली

औरंगाबाद : सिडको-हडकोसह शहराला तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या गंभीर समस्येवर ‘लोकमत’ने ७ मेपासून वृत्त मालिका सुरू केल्यामुळे शासन, प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून हर्सूल तलावातून ६ एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याच्या कामाला सुरूवात झाली. एमआयडीसी प्रशासनाकडून ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळण्यास सुरुवात झाली.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावते आहे. एप्रिल महिन्यात पारा ४२ अंशापर्यंत गेल्याने पाण्याची मागणी आणखी वाढली. महापालिकेकडून समाधानकारक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचा आक्रोश वाढू लागला. नागरिकांच्या मनातील खदखद ‘लोकमत’ने जाणली. शहरातील पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत ‘हॅलो लोकमत’मध्ये वृत्तमालिकाच सुरू करण्यात आली. नागरिकांनीही ‘लोकमत’च्या या भूमिकेस पाठिंबा दिला. जायकवाडीहून १३० ते १४० एमएलडी पाणी शहरात दररोज येत आहे. त्यानंतरही पाणीटंचाई का? नागरिकांच्या हक्काचे पाणी कोण पळवतय, महापालिकेकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. लाईनमन ठरवेल तिच पूर्वदिशा समजून काम करण्यात येत असल्याबद्दल ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली.

जुन्या शहराला मोठा दिलासाहर्सूल तलावातून महापालिका दररोज फक्त ४ एमएलडी पाण्याचा उपसा करीत होती. या पाण्यात १० एमएलडीपर्यंत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून सोमवारी हर्सूल तलाव ते जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास सुरूवात झाली. पुढील ३ दिवसात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर हर्सूल तलावातून अतिरक्त ६ एमएलडी पाणी जुन्या शहराला मिळेल. हे पाणी दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत आणले जाईल. हर्सूल तलावात सध्या मुबलक पाणी असून, ते जुलै अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज आहे.

एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणीमनपाने नियुक्त केलेल्या टँकरच्या कंत्राटदाराकडून एन-५, एन-७, कोटला कॉलनी, नक्षत्रवाडी येथून ९५ टँकर भरण्यात येतात. दररोज ५०० फेऱ्या टँकरच्या होतात. ४ ते ५ एमएलडी पाणी टँकर लॉबी पळवून नेत होती. सर्व टँकर हळूहळू एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यावर शिफ्ट करण्यात येत आहेत. एन-७ येथून टँकर भरणे सध्या बंद केले. सध्या एमआयडीसी १ एमएलडी पाणी देत आहे. लवकरच ४ एमएलडीपर्यंत टँकरसाठी पाणी मनपाला मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई