शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांची तहान भागणार; मनपा एमआयडीसी, हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:04 IST

‘लोकमत’इफेक्ट : हर्सूल तलावातून ६, एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली

औरंगाबाद : सिडको-हडकोसह शहराला तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या गंभीर समस्येवर ‘लोकमत’ने ७ मेपासून वृत्त मालिका सुरू केल्यामुळे शासन, प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून हर्सूल तलावातून ६ एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याच्या कामाला सुरूवात झाली. एमआयडीसी प्रशासनाकडून ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळण्यास सुरुवात झाली.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावते आहे. एप्रिल महिन्यात पारा ४२ अंशापर्यंत गेल्याने पाण्याची मागणी आणखी वाढली. महापालिकेकडून समाधानकारक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचा आक्रोश वाढू लागला. नागरिकांच्या मनातील खदखद ‘लोकमत’ने जाणली. शहरातील पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत ‘हॅलो लोकमत’मध्ये वृत्तमालिकाच सुरू करण्यात आली. नागरिकांनीही ‘लोकमत’च्या या भूमिकेस पाठिंबा दिला. जायकवाडीहून १३० ते १४० एमएलडी पाणी शहरात दररोज येत आहे. त्यानंतरही पाणीटंचाई का? नागरिकांच्या हक्काचे पाणी कोण पळवतय, महापालिकेकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. लाईनमन ठरवेल तिच पूर्वदिशा समजून काम करण्यात येत असल्याबद्दल ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली.

जुन्या शहराला मोठा दिलासाहर्सूल तलावातून महापालिका दररोज फक्त ४ एमएलडी पाण्याचा उपसा करीत होती. या पाण्यात १० एमएलडीपर्यंत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून सोमवारी हर्सूल तलाव ते जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास सुरूवात झाली. पुढील ३ दिवसात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर हर्सूल तलावातून अतिरक्त ६ एमएलडी पाणी जुन्या शहराला मिळेल. हे पाणी दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत आणले जाईल. हर्सूल तलावात सध्या मुबलक पाणी असून, ते जुलै अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज आहे.

एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणीमनपाने नियुक्त केलेल्या टँकरच्या कंत्राटदाराकडून एन-५, एन-७, कोटला कॉलनी, नक्षत्रवाडी येथून ९५ टँकर भरण्यात येतात. दररोज ५०० फेऱ्या टँकरच्या होतात. ४ ते ५ एमएलडी पाणी टँकर लॉबी पळवून नेत होती. सर्व टँकर हळूहळू एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यावर शिफ्ट करण्यात येत आहेत. एन-७ येथून टँकर भरणे सध्या बंद केले. सध्या एमआयडीसी १ एमएलडी पाणी देत आहे. लवकरच ४ एमएलडीपर्यंत टँकरसाठी पाणी मनपाला मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई