शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांची तहान भागणार; मनपा एमआयडीसी, हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:04 IST

‘लोकमत’इफेक्ट : हर्सूल तलावातून ६, एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली

औरंगाबाद : सिडको-हडकोसह शहराला तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या गंभीर समस्येवर ‘लोकमत’ने ७ मेपासून वृत्त मालिका सुरू केल्यामुळे शासन, प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून हर्सूल तलावातून ६ एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याच्या कामाला सुरूवात झाली. एमआयडीसी प्रशासनाकडून ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळण्यास सुरुवात झाली.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावते आहे. एप्रिल महिन्यात पारा ४२ अंशापर्यंत गेल्याने पाण्याची मागणी आणखी वाढली. महापालिकेकडून समाधानकारक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचा आक्रोश वाढू लागला. नागरिकांच्या मनातील खदखद ‘लोकमत’ने जाणली. शहरातील पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत ‘हॅलो लोकमत’मध्ये वृत्तमालिकाच सुरू करण्यात आली. नागरिकांनीही ‘लोकमत’च्या या भूमिकेस पाठिंबा दिला. जायकवाडीहून १३० ते १४० एमएलडी पाणी शहरात दररोज येत आहे. त्यानंतरही पाणीटंचाई का? नागरिकांच्या हक्काचे पाणी कोण पळवतय, महापालिकेकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. लाईनमन ठरवेल तिच पूर्वदिशा समजून काम करण्यात येत असल्याबद्दल ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली.

जुन्या शहराला मोठा दिलासाहर्सूल तलावातून महापालिका दररोज फक्त ४ एमएलडी पाण्याचा उपसा करीत होती. या पाण्यात १० एमएलडीपर्यंत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून सोमवारी हर्सूल तलाव ते जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास सुरूवात झाली. पुढील ३ दिवसात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर हर्सूल तलावातून अतिरक्त ६ एमएलडी पाणी जुन्या शहराला मिळेल. हे पाणी दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत आणले जाईल. हर्सूल तलावात सध्या मुबलक पाणी असून, ते जुलै अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज आहे.

एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणीमनपाने नियुक्त केलेल्या टँकरच्या कंत्राटदाराकडून एन-५, एन-७, कोटला कॉलनी, नक्षत्रवाडी येथून ९५ टँकर भरण्यात येतात. दररोज ५०० फेऱ्या टँकरच्या होतात. ४ ते ५ एमएलडी पाणी टँकर लॉबी पळवून नेत होती. सर्व टँकर हळूहळू एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यावर शिफ्ट करण्यात येत आहेत. एन-७ येथून टँकर भरणे सध्या बंद केले. सध्या एमआयडीसी १ एमएलडी पाणी देत आहे. लवकरच ४ एमएलडीपर्यंत टँकरसाठी पाणी मनपाला मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई