शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

दर्जेदार, आशयघन कलाकृतींना औरंगाबादकरांचा उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 8:19 PM

विश्लेषण : दर्जेदार, आशयघन कार्यक्रम असतील तर रसिक, श्रोते हजेरी लावतात, हे औरंगाबादकरांनी दाखवून दिले.

- राम शिनगारे 

औरंगाबाद हे चळवळीचे शहर. सामाजिक, राजकीयसह इतरही घटनांची सुरुवात येथूनच होते. या शहरात विविध संस्था, संघटना व्याख्यान, चित्रप्रदर्शन, महोत्सव, आंदोलनाचे नियमितपणे आयोजन करीत असतात. या कार्यक्रमांना व्याख्याते, कलाकार, आयोजक तेच तेच असल्यामुळे रसिकांनी नेहमीच पाठ फिरविल्याचे दिसून येते. मात्र, शहरात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल, विवेकानंद व्याख्यानमालेसह इतर कार्यक्रमांना औरंगाबादकरांनी दिलेला प्रतिसाद उदंड असाच होता. दर्जेदार, आशयघन, काहीतरी माहिती देणाऱ्या कलाकृतींचे रसग्रहण करण्यासाठी रसिक स्वत:हून जातात. हेच यातून दिसून आले.

चित्रपट, फिल्म फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले की पुणे, मुंबईचे नाव निघते. मात्र, औरंगाबादेत दर्जेदार कलाकृतींना आणून रसिकांना दाखविण्याचा विडाच काही युवकांनी घेतला होता. त्यास बुजुर्गांनी साथ दिली. यातूनच औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची संकल्पना पुढे आली. यावर्षी फेस्टिव्हलचे सहावे वर्ष. ९ ते १३ जानेवारीदरम्यान पार पडला. यात कोल्ड वॉर, लव्हलेस, शॉप लिफ्टर्स, मंटो, आरोण, न्यूड, जोहार मायबाप, बंदीशाळा घटश्राद्ध, आम्रीत्यूम, आम्ही दोघी, अब्बू, सिन्सिअरली युवर्स ढाका यांच्यासह जगविख्यात दिग्दर्शक असलेले इंगमार बर्गमन यांनी दिग्दर्शित केलेले वाईल्ड स्ट्रॉबेरीज, सेव्हन्थ सिल, परसोना, आॅटम्न सोनाटा हे जागतिक दर्जाचे चित्रपट दाखविले. बर्गमन यांची जन्मशताब्दी असल्यामुळे स्वीडिश सरकारने त्यांचे चित्रपट उपलब्ध करून दिले. अशा दर्जेदार कलाकृती असलेल्या चित्रपटांना रसिकांनी गर्दी केली. चित्रपटासह कार्यक्रमांना येणाऱ्यांमध्ये ८० टक्के युवक होते.

चार दिवसांमध्ये तब्बल ५५०० पेक्षा अधिक जणांनी चित्रपट पाहिले. याशिवाय महोत्सवाच्या ठिकाणी गदिमा, पुल, सुधीर फडके, मन्ना डे, स्नेहल पाटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लावलेल्या पोस्टर प्रदर्शनालाही हजारोंच्या संख्येने रसिकांनी भेटी दिल्या. शहरात फेस्टिव्हल संस्कृती रुजविण्यासाठी आयोजक युवकांनी २० पेक्षा अधिक महाविद्यालयांत चित्रपट रसग्रहण कार्यशाळा घेतल्या. त्यासही युवकांनी उत्तम प्रतिसाद दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त ‘गांधी आणि सिनेमा’ या विषयावर अमरित गांगर यांच्या व्याख्यानालाही युवकांनी गर्दी केली होती. याच महोत्सवात शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी घेतलेला मास्टर क्लासही लक्षणीय ठरला. ज्येष्ठ उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, अशोक राणे, प्रा. शिव कदम, नीलेश राऊत यांनी युवकांच्या सहकार्याने औरंगाबादकरांना दर्जेदार मेजवानी दिली.

विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे १४ ते १६ जानेवारीदरम्यान पहिल्यांदाच विवेकांनद जयंतीनिमित्त ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ सुरू केली. यात मॅगसेस पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांनी ‘शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या’ या विषयावर व्याख्यान दिले. शेतकरी हा विषय आला की नेहमीचेच रडगाणे, असा काहीसा दृष्टिकोन बनलेल्या वातावरणात त्यांच्या व्याख्यानाला मिळालेला प्रतिसाद निश्चित विचारी मनाला दिलासादायक होता. यानंतर दुसरे व्याख्यान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे झाले. यात व्याख्यानाला पहिल्या दिवशीच्या व्याख्यानापेक्षा अधिक गर्दी होती. यात युवकांची संख्या लक्षणीय होती, हे विशेष.

हवामान बदल हा विषय समजून घेण्याची युवकांची उत्सुकता वाखाणण्याजोगी होती. जम्मू-काश्मिरात अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केलेल्या कुटुंबातील मुलींसाठी झगडणाऱ्या अधिक कदम यांच्या व्याख्यानमालेतील शेवटच्या व्याख्यानाला शहरातील युवकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. श्रोत्यांना बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडल्या. हा संकेत आनंददायी आहे, हे निश्चित. काही दिवसांपूर्वी बशर नवाज यांच्या स्मरणार्थ ‘बज्म-ए-बशर’ हा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आणि आम्ही परभणीकर सांस्कृतिक मंचतर्फे दत्तप्रसाद रानडे यांच्या गजल मैफल आयोजित केली होती. त्या कार्यक्रमालाही सभागृहात बसण्यास जागा शिल्लक राहिली नव्हती. यावरून दर्जेदार, आशयघन कार्यक्रम असतील तर रसिक, श्रोते हजेरी लावतात, हे औरंगाबादकरांनी दाखवून दिले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकSocialसामाजिक