शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, ‘ओमायक्रॉन’ आपल्यापासून दूर नव्हे, तो चक्क वेशीपर्यंत येऊन ठेपलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:34 IST

Omicron Variant ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होतो, असा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यानंतरही नागरिक खबरदारी घेण्यास तयार नाहीत, हे विशेष.

औरंगाबाद : राज्यात ओमायक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण हळूहळू वाढत आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये २९ रुग्ण आढळून आले. सुदैवाने औरंगाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला नाही. औरंगाबादपासून अत्यंत जवळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली. अवघ्या १४८ कि.मी. अंतरावर रुग्ण आढळून आहे. या विषाणूचा अटकाव करणे कोणालाही शक्य नाही, खबरदारी हाच एकमेव उपाय असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोरोना प्रतिबंधाच्या दोन लस घेतलेल्या रुग्णांना ओमायक्रॉनचा फारसा त्रास झाला नसल्याचे आढळून आले. जिल्हा प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभाग लसीकरणावर प्रचंड भर देत आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे शहरातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झालेले असावे, हा प्रशासनाचा हेतू आहे. मात्र नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. मास्क तर अजिबात वापरायला तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागत आहेत. बुधवारपासून लस न घेतलेले नागरिक शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यास ५०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली गेली. त्यानंतरही फारशी सुधारणा झालेली नाही. राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत. या रुग्णांची संख्या तब्बल ३१ पर्यंत गेली. ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होतो, असा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यानंतरही नागरिक खबरदारी घेण्यास तयार नाहीत, हे विशेष.

रुग्णसंख्या, औरंगाबादपासून अंतरजिल्हा- रुग्ण- अंतरपिंपरी चिंचवड- १०- २४५ कि.मी.पुणे- २- २३९ कि.मीमुंबई- १२- ३६४ कि.मी.कल्याण डोंबिवली-१- ३३३ कि.मी.लातूर- १- २६३ कि.मी.बुलडाणा- १- १४८ कि.मी.नागपूर- १- ४७५ कि.मी.वसई-विरार-१- ३५८ कि.मी.उस्मानाबाद -२- २५६ कि.मी.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनAurangabadऔरंगाबाद