शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शिवसेना आमदारांच्या बंडाळीने जिल्हा परिषद निवडणूकीत समीकरण बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:21 IST

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावरही या बंडाळीचे दूरगामी परिणाम होतील.

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसह पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने जि. प.च्या आगामी निवडणुकीचे समीकरण बदलणार असल्याचे दिसून येते.

जि. प.वर एकहाती सत्ता आणण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पैठण विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आ. तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे, सिल्लोडचे आ. ग्रामविकास तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह वैजापूर मतदारसंघाचे शिवसेना आ. रमेश बोरनारे आणि औरंगाबाद पश्चिमचे आ. संजय शिरसाट, मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल यांनी पक्षप्रमुखांविरोधात जाहीर बंड केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावरही या बंडाळीचे दूरगामी परिणाम होतील.

मावळत्या जि. प.त शिवसेनेचे १९ सदस्य निवडून आले होते. या सदस्यांमुळे जि. प. अध्यक्षपदी देवयानी डोणगावकर या पहिली अडीच वर्षे अध्यक्षा होत्या. २०१९ साली अब्दुल सत्तार हे शिवसेनेत प्रवेश करताना त्यांच्यासोबत काँग्रेसचे ६ सदस्य आल्याने शिवसेनेचे संख्याबळ २५ पर्यंत वाढले होते. आगामी जि.प. निवडणुकीत ७० सदस्य निवडले जातील. शिवसेनेचे दोन मंत्री आणि आमदारांच्या जोरावर आगामी निवडणुकीत जि. प.त शिवसेनेचे बहुमत असेल, असा विश्वास मावळते पदाधिकारी व्यक्त करीत होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी झालेल्या भुमरे, सत्तार यांच्यासह पाच आमदारांच्या बंडखोरीने जि.प.चे राजकारणच बदलून गेले आहे. बंडखोरांकडून अद्याप शिवसेना सोडली नाही, असा दावा केला जात असला तरी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याने त्याचा फायदा अन्य पक्षांना होऊ शकतो.

मावळत्या जि. प.तील संख्याबळशिवसेना- १८भाजप- २३काँग्रेस- १६राष्ट्रवादी काँग्रेस -३मनसे- १रिपाइं- १-------एकूण ६२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ