शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

औरंगाबादच्या विमानसेवा कनेक्टिव्हिटीवर आठवड्यात होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 7:44 PM

केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री  हरदीपसिंग पुरी यांना भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीमध्ये दिले निवेदन

औरंगाबाद : ऐतिहासिक, औद्योगिकदृष्ट्या औरंगाबाद शहराचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे तेथे विमानसेवा असणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन विमानसेवेच्या कनेक्टिव्हिटी औरंगाबादला देण्याबाबत आठवड्यात निर्णय होईल, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी भाजप शिष्टमंडळाला बुधवारी सांगितले. 

केंद्रीय राज्यमंत्री खा.रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री पुरी आणि सचिव प्रकाश करोला यांची भेट घेतली. या भेटीबाबत प्रवक्ते बोराळकर यांनी सांगितले, २५ विमानतळांच्या कनेक्टिव्हिटीची क्षमता औरंगाबाद विमानतळावर आहे. तरीही तेथे फक्त तीन विमान सध्या सेवा देत आहेत. उद्योग आणि पर्यटनाच्या दृृष्टीने शहराचे महत्त्व जागतिक पटलावर मोठे आहे. संध्याकाळच्या वेळेत विमानसेवा नाही. तातडीने विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने मंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली.

यावर केंद्रीय मंत्री पुरी यांनी सचिव करोला यांना फोन करून विमानसेवेबाबत आढावा घेतला. तसेच शिष्टमंडळाला सचिव करोला यांनाही निवेदन देऊन परिस्थिती अवगत करण्यास सांगितले. करोला हे पर्यटन विभागाचे सचिव असताना त्यांनी अजिंठा लेण्यासाठी एका प्रकल्पावर काम केलेले असल्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. खाजगी विमानसेवा कंपन्यांशी तातडीने चर्चा करून सायंकाळच्या वेळेत विमान सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच एक थांबा देऊन इतर शहरांशी व राज्यांशी कनेक्टिव्हिटी देण्याबाबत विचार व्हावा. त्यामुळे जसे नागपूरहून जाताना विमाने एका ठिकाणी थांबतात. तसेच औरंगाबादहून एक थांबा देऊन विमाने सुरू केल्यास कंपन्यांना प्रवासी मिळतील, असेही मत शिष्टमंडळाने सचिवांकडे मांडले.  

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार