शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

वार्षिक ३०० कोटींची उलाढाल असणारे औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ बाजाराचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 6:52 PM

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ९५ आठवडी बाजार  भरतात. त्यांची एकूण वार्षिक उलाढाल तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे. गावांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनलेले हे आठवडी बाजार मात्र विकासापासून कोसो मैल दूर आहेत.

ठळक मुद्देथेट शेतकरी-ग्राहक आठवडी बाजारचा राज्य सरकार मोठा गाजावाजा करीत आहे. त्यासाठी मोठा खर्चही करण्यात येत आहे. आजही बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, मोकळ्या जागेत भरविले जातात. या बाजारामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. 

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ९५ आठवडी बाजार  भरतात. त्यांची एकूण वार्षिक उलाढाल तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे. गावांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनलेले हे आठवडी बाजार मात्र विकासापासून कोसो मैल दूर आहेत. कारण, आजही बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, मोकळ्या जागेत भरविले जातात. या बाजारामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. 

थेट शेतकरी-ग्राहक आठवडी बाजारचा राज्य सरकार मोठा गाजावाजा करीत आहे. त्यासाठी मोठा खर्चही करण्यात येत आहे. मात्र, वर्षानुवर्षे गावात भरणार्‍या आठवडी बाजाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात आठवडी बाजारांची आवश्यकता आहे; पण ग्रामीण अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या आठवडीबाजारात पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी ना राज्य सरकार प्रयत्न करते ना स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका प्रयत्न करते. यामुळे मागील वर्षानुवर्षे सुरूअसलेल्या आठवडी बाजारात ‘विकास’ कधी पोहोचलाच नाही.

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला, तर येथील ९ तालुक्यांत मिळून ९५ आठवडी बाजार भरतात. त्यातील ४ आठवडीबाजार शहरात आहेत. याशिवाय औरंगाबाद तालुक्यात ७, फुलंब्री ७, सिल्लोड १२, पैठण ११, खुलताबाद ६, कन्नड १२, वैजापूर १६, गंगापूर १४ तर सोयगाव तालुक्यात ६ आठवडीबाजार भरविले जातात. या आठवडी बाजारांमध्ये स्थानिक व आसपासच्या पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापारी कृषी माल व इतर साहित्य विक्रीसाठी आणतात. ताज्या भाजीपाल्यापासून ते कापसापर्यंत व कटलरीपासून ते मोबाईल एक्सेसरीज येथे विक्रीसाठी आणले जाते. या आठवडी बाजारचे महत्त्व लक्षात घेऊन  कृषी साहित्य उत्पादक कंपन्या, कीटकनाशक, बी-बियाणे कंपन्याही उत्पादन विक्रीसह येथे प्रचार-प्रसारासाठी येतात.

९५ आठवडी बाजारात मिळून वार्षिक ३०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत असते. यावरून येथील अर्थकारणाचा अंदाज येऊ शकतो. बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, गावातील मोकळ्या जागेत, मातीत, चिखल, नाल्याच्या बाजूला भरविले जातात. शेतकर्‍यांना, विक्रेत्यांना शेतीमाल विक्रीसाठी ओटे नाहीत. पत्र्याचे शेड तर दूरच राहिले. बांबूला ताडपत्री बांधून विक्रेते येथे व्यवसाय करीत असतात. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागते.  बसण्याची जागाही स्वच्छ करून घ्यावी लागते. बहुतांश ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्याने सायंकाळ होताच विक्रेत्यांना व्यवसाय गुंडाळावा लागतो. ग्रामपंचायती, नगरपालिका फक्त आठवडी बाजाराचा ठेका देण्यापुरत्याच काम करतात. बाकी सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. दोन वर्षांपूर्वी आठवडी बाजारांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारने योजना आणली होती; पण ‘कागदा’वरच राहिली. 

आठवडी बाजार सशक्तीकरणाचा निर्णय शेतकर्‍यांचे उत्पन्न दीडपट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ व २० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद घेतली. यात देशातील २५० कृषी संशोधक, प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश होता. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली मी या परिषदेत सहभागी झालो होतो. देशातील आठवडीबाजार सशक्तीकरण करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. यासाठी २ हजार आठवडी बाजारात पथदर्शी प्रकल्प  राबविण्यात येणार आहे. या आठवडीबाजारातही ई-मार्केटिंग सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला.-भगवानराव कापसे, गटशेती प्रणेते

शहरातील आठवडी बाजाराचे हालजिल्ह्यातील ग्रामीण भागात ९१ आठवडी बाजार भरविले जातात. औरंगाबाद शहरात ४ आठवडीबाजार वर्षानुवर्षापासून भरविले जात आहेत. रविवारचा जाफरगेट येथील आठवडी बाजार, सोमवारी पीरबाजार, गुरुवारी छावणीतील आठवडी बाजार, तर शुक्रवारी चिकलठाणा येथे आठवडी बाजार भरतो. यात छावणी परिषदेने विक्रेत्यांसाठी ओटे व पत्र्याचे शेड उभारले आहे. तसेच पीरबाजार येथे पत्र्याचे शेड व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जाफरगेट व चिकलठाणा येथील आठवडीबाजारात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. पडलेले ओटे, तुटलेले पत्र्याचे शेड, पिण्याचा पाण्याचा अभाव येथेही आहेच. 

कोणत्या वाराच्या दिवशी किती आठवडी बाजार भरविले जातात. १) रविवार -    १७२) सोमवार-    ८३) मंगळवार-    १३४) बुधवार-    १६ ५) गुरुवार-    १८ ६) शुक्रवार-    १३७) शनिवार-    १०

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद