शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad: औरंगाबादच्या पाणी प्रश्नासाठी 23 मे रोजी भाजपचा 'आक्रोश मोर्चा', देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 15:35 IST

Aurangabad: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली.

औरंगाबाद: नाथसागरसारखे मोठे धरण लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः औरंगाबाद शहरात(Aurangabad city) तीव्र पाणी टंचाई भासत आहे. सध्या शहारातील नागरिकांना आठ ते नऊ दिवसातून एकदा पाणी दिले जाते. पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी नागरिकांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावरुन आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 23 मे रोजी औरंगाबाद शहरात भाजपच्या वतीने मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) करतील.

आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. याबाबत सांगताना कराड म्हणाले की, सध्या औरंगाबाद शहरात भीषण पाणी टंचाई भासत आहे. आठ ते नऊ दिवसांनी स्थानिकांना पाण्याचा पुरवठा केला जातोय. यात लोडशेडींगमुळे हा पुरवठा अपुरा पडतोय. या सर्व कारणांमुळे औरंगाबादकरांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी निम्मी केली, पण त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाही. 

पाणीपट्टी परत करण्याची मागणीहा जनतेचा रोष लक्षात घेऊन भाजपच्या वतीने येत्या 23 मे रोजी दुपारी शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चात हजारो महिला पाण्याचे हंडे घेऊन सहभागी होतील. हा आक्रोश मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे, अशी माहिती कराड यांनी दिली. तसेच, यावेळी नागरिकांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली.

‘शिवसेनेसोबत भाजपाही जबाबदार’भाजपसह एमआयएमनेही पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel ) यांनी केली आहे. तसेच, भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलील