शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Aurangabad: औरंगाबादच्या पाणी प्रश्नासाठी 23 मे रोजी भाजपचा 'आक्रोश मोर्चा', देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 15:35 IST

Aurangabad: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली.

औरंगाबाद: नाथसागरसारखे मोठे धरण लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः औरंगाबाद शहरात(Aurangabad city) तीव्र पाणी टंचाई भासत आहे. सध्या शहारातील नागरिकांना आठ ते नऊ दिवसातून एकदा पाणी दिले जाते. पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी नागरिकांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावरुन आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 23 मे रोजी औरंगाबाद शहरात भाजपच्या वतीने मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) करतील.

आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. याबाबत सांगताना कराड म्हणाले की, सध्या औरंगाबाद शहरात भीषण पाणी टंचाई भासत आहे. आठ ते नऊ दिवसांनी स्थानिकांना पाण्याचा पुरवठा केला जातोय. यात लोडशेडींगमुळे हा पुरवठा अपुरा पडतोय. या सर्व कारणांमुळे औरंगाबादकरांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी निम्मी केली, पण त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाही. 

पाणीपट्टी परत करण्याची मागणीहा जनतेचा रोष लक्षात घेऊन भाजपच्या वतीने येत्या 23 मे रोजी दुपारी शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चात हजारो महिला पाण्याचे हंडे घेऊन सहभागी होतील. हा आक्रोश मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे, अशी माहिती कराड यांनी दिली. तसेच, यावेळी नागरिकांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली.

‘शिवसेनेसोबत भाजपाही जबाबदार’भाजपसह एमआयएमनेही पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel ) यांनी केली आहे. तसेच, भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलील