शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

Aurangabad: औरंगाबादच्या पाणी प्रश्नासाठी 23 मे रोजी भाजपचा 'आक्रोश मोर्चा', देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 15:35 IST

Aurangabad: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली.

औरंगाबाद: नाथसागरसारखे मोठे धरण लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः औरंगाबाद शहरात(Aurangabad city) तीव्र पाणी टंचाई भासत आहे. सध्या शहारातील नागरिकांना आठ ते नऊ दिवसातून एकदा पाणी दिले जाते. पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी नागरिकांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावरुन आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 23 मे रोजी औरंगाबाद शहरात भाजपच्या वतीने मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) करतील.

आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. याबाबत सांगताना कराड म्हणाले की, सध्या औरंगाबाद शहरात भीषण पाणी टंचाई भासत आहे. आठ ते नऊ दिवसांनी स्थानिकांना पाण्याचा पुरवठा केला जातोय. यात लोडशेडींगमुळे हा पुरवठा अपुरा पडतोय. या सर्व कारणांमुळे औरंगाबादकरांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी निम्मी केली, पण त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाही. 

पाणीपट्टी परत करण्याची मागणीहा जनतेचा रोष लक्षात घेऊन भाजपच्या वतीने येत्या 23 मे रोजी दुपारी शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चात हजारो महिला पाण्याचे हंडे घेऊन सहभागी होतील. हा आक्रोश मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे, अशी माहिती कराड यांनी दिली. तसेच, यावेळी नागरिकांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली.

‘शिवसेनेसोबत भाजपाही जबाबदार’भाजपसह एमआयएमनेही पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel ) यांनी केली आहे. तसेच, भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलील