शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Aurangabad: औरंगाबादच्या पाणी प्रश्नासाठी 23 मे रोजी भाजपचा 'आक्रोश मोर्चा', देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 15:35 IST

Aurangabad: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली.

औरंगाबाद: नाथसागरसारखे मोठे धरण लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः औरंगाबाद शहरात(Aurangabad city) तीव्र पाणी टंचाई भासत आहे. सध्या शहारातील नागरिकांना आठ ते नऊ दिवसातून एकदा पाणी दिले जाते. पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी नागरिकांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावरुन आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 23 मे रोजी औरंगाबाद शहरात भाजपच्या वतीने मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) करतील.

आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. याबाबत सांगताना कराड म्हणाले की, सध्या औरंगाबाद शहरात भीषण पाणी टंचाई भासत आहे. आठ ते नऊ दिवसांनी स्थानिकांना पाण्याचा पुरवठा केला जातोय. यात लोडशेडींगमुळे हा पुरवठा अपुरा पडतोय. या सर्व कारणांमुळे औरंगाबादकरांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी निम्मी केली, पण त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाही. 

पाणीपट्टी परत करण्याची मागणीहा जनतेचा रोष लक्षात घेऊन भाजपच्या वतीने येत्या 23 मे रोजी दुपारी शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चात हजारो महिला पाण्याचे हंडे घेऊन सहभागी होतील. हा आक्रोश मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे, अशी माहिती कराड यांनी दिली. तसेच, यावेळी नागरिकांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली.

‘शिवसेनेसोबत भाजपाही जबाबदार’भाजपसह एमआयएमनेही पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel ) यांनी केली आहे. तसेच, भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलील