शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

औरंगाबाद शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची ‘श्रीमंती’ रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 8:09 PM

रयतेचे राज्य स्थापन करून मराठ्यांचा पराक्रम, शौर्याची गाथा सर्वदूर पसरविणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या शहरातील पुराणवस्तू संग्रहालयाकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने भेट देणार्‍यांची निराशा होत आहे

ठळक मुद्देया संग्रहालयात शिवकालीन समाजजीवन आणि युद्धनीतीचा प्रत्यक्ष इतिहास सांगणार्‍या सुमारे चार हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या हस्ते २६ डिसेंबर, १९९९ रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.

औरंगाबाद : रयतेचे राज्य स्थापन करून मराठ्यांचा पराक्रम, शौर्याची गाथा सर्वदूर पसरविणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या शहरातील पुराणवस्तू संग्रहालयाकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने भेट देणार्‍यांची निराशा होत आहे. सुभेदारी विश्रामगृहाजवळील‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालया’ला अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही, अपुरे मनुष्यबळ, आधुनिक सुविधांचा अभाव आणि जीर्ण होत असलेली इमारत व भेट देणार्‍या पर्यटकांचा आटणारा ओघ, अशा अनेक समस्यांनी हे संग्रहालय ग्रासलेले आहे.

या संग्रहालयात शिवकालीन समाजजीवन आणि युद्धनीतीचा प्रत्यक्ष इतिहास सांगणार्‍या सुमारे चार हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तसे पाहिले तर शहरातील प्रमुख आकर्षण स्थळांपैकी एक असलेले हे संग्रहालय वीस वर्षे होऊनही दुर्लक्षित आहे. पर्यटकांनी सांगितल्याप्रमाणे येथे सर्वात मोठी अडचण आहे ती पार्किंग व्यवस्थेची. संग्रहालयाला स्वत:ची अधिकृत पार्किंगची स्वतंत्र जागा नसल्यामुळे सुभेदारीसमोरील मोकळ्या जागेवर गाड्या लावाव्या लागतात. त्यामुळे बाहेरून येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होते.संग्रहालयात फक्त चार कर्मचारी आहेत. त्यामुळे पाच दालनांमध्ये ठेवण्यात आलेल्या हजारो वस्तूंची ऐतिहासिक माहिती सर्वच पर्यटकांना देणे शक्य होत नाही. शाळेची सहल आली असता विद्यार्थ्यांना केवळ एक चक्कर मारून आणली जाते. त्यामुळे संग्रहालयाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो.

मुंबई-पुण्याच्या संग्रहालयांच्या धर्तीवर ना येथे डिजिटल फलक आहेत, ना आधुनिक सुविधा. स्वच्छतागृहांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. भिंतीमध्ये पाणी झिरपल्याने ठिकठिकाणी डाग पडलेले आहेत. त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्ताने का होईना मनपा प्रशासनाचे इकडे लक्ष जाईल का? असा सवाल इतिहासप्रेमींतून विचारला जात आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या हस्ते २६ डिसेंबर, १९९९ रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धात वापरली जाणारे शस्त्रे, दैनंदिन जीवनातील वस्तू, पुरातन नाणी, वस्त्रे, भांडी, चित्रे, हस्तलिखिते, अशा सुमारे चार हजार वस्तू डॉ. शांतीलाल पुरवार, लांबतुरे आणि रुणवाल यांनी दान केल्या आहेत. त्यांना महिन्याकाठी पाच हजार रुपये मानधन दिले जाते. क्युरेटर सर्वेश नांद्रेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संग्रहालयाला वर्षाकाठी सुमारे चाळीस हजार पर्यटक भेट देतात आणि त्यातून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळते.

संग्रहालयाची जाहिरातच नाहीबीबीका मकबरा, पाणचक्की, सोनेरी महलप्रमाणे शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची जाहिरात किंवा प्रचार केला जात नाही. त्यामुळे बाहेरून येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांना याविषयी जास्त माहिती होत नाही. पर्यटक आणि संशोधकांना याकडे आकर्षित करण्यासाठी मनपाने विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद