शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

पोलिसांचा वचक आणि सतर्क नागरिकांमुळे महिलांसाठी औरंगाबाद सुरक्षित शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 20:05 IST

रात्री, बेरात्री एकटी महिला, तरुणी कोठेही फिरू शकते

ठळक मुद्देपोलिसांच्या विविध उपाययोजनाप्रभावी दामिनी पथक

- बापू सोळुंके

औरंगाबाद : राजकीय, सामाजिक चळवळीचे प्रमुख केंद्र बनलेले औरंगाबाद  महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी हेल्पलाईन नंबर, व्हॉटस्अप नंबर उपलब्ध केले. एवढेच नव्हे, तर दामिनी पथक सतत महाविद्यालयात आणि मुलींच्या वसतिगृहात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधते. यामुळे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी एकट्या राहणाऱ्या महिला, मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते.

औद्योगिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराचा चोहोबाजूने झपाट्याने विस्तार होत आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी बाहेरगावहून येथे येऊन एकटीने राहणाऱ्या महिला कामगार आणि विद्यार्थिनींची संख्या एक लाखाहून अधिक आहे. यातील काही जणी खोली किरायाने घेऊन राहतात, तर काही महिला, मुली वसतिगृहात राहतात. एकटीने राहणाऱ्या महिला, तरुणींना त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता वाटू नये याकरिता शहर पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. वसतिगृहातील प्रत्येक मुलीकडे पोलीस नियंत्रण कक्ष, दामिनी पथक आणि पोलिसांच्या हेल्पलाईनचे मोबाईल नंबर आहेत.

बाहेरगावाहून रात्री उशिरा बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे आल्यानंतर घरी जाण्यासाठी मदत हवी असेल तर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यास पोलीस त्यांच्या वाहनातून महिला, तरुणीला घरी नेऊन सोडतात. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पोलीस उपस्थित असतात. रेल्वेस्टेशन, महावीर चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, हर्सूल टी-पॉइंट आदी  महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरेही सुरक्षा कवच म्हणून काम करतात. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होत आहे.

प्रभावी दामिनी पथकमहिलांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी प्रत्येक ठाण्यांतर्गत महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतो. यामुळे तक्रारदार महिला त्यांना नि:संकोचपणे तक्रार सांगू शकते.  दामिनी पथक नियमितपणे शहरातील विविध महाविद्यालये, मुलींच्या वसतिगृहात जाऊन मुलींशी संवाद साधते. त्यांच्याशी कोणीही गैरवर्तन करीत असेल, तर त्यांना थेट लॉकअपमध्ये डांबले जाते. यामुळे दामिनी पथकाने शहरात चांगलाच दबदबा निर्माण केला. या पथकातील उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी त्यांचे मोबाईल आणि व्हॉटस्अप क्रमांक दिले. काही वर्षांपूर्वी निर्जनस्थळी तरुणींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन बीट हवालदार आणि दामिनी पथक निर्जनस्थळी गस्त घालतात.

कामावर येणे-जाणे सुरक्षितशहरालगतच्या वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीत हजारो महिला कामगार आहेत. यातील अनेक महिला रात्री उशिरा कामावरून घरी परततात. शिवाय शहरात काम करणाऱ्या महिला कामगार, रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका, महिला डॉक्टर रात्री उशिरा कामावर जाऊ शकतात आणि बिनधास्तपणे घरी येऊ शकतात. अनेक विद्यार्थिनी रात्री उशिरापर्यंत अभ्यासिकेत असतात. रात्री उशिरा एकट्या घरी जाताना दिसतात. शहरातील सिनेमाघरात रात्री शेवटचा शो एक  ते दीड वाजता संपतो. सिनेमा पाहून  दुचाकीने अथवा रिक्षाने घरी परतणाऱ्या मुली, महिलांच्या चेहऱ्यांवर घरी पोहोचण्यासंदर्भात कोणतीही साशंकता नसते.

घरात घुसून लुटीची घटना अपवाद१५ दिवसांपूर्वी शास्त्रीनगर येथे एका घरात घुसून वृद्ध मायलेकींना मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. प्राचार्य जीवन देसाई यांच्या घराच्या अंगणात येऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा झाडून कामाला लागली आहे. रस्त्यावर छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसून येते. 

टॅग्स :WomenमहिलाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस