शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

औरंगाबादवर संकट नाही; परंतु हा काळ संक्रमणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 6:06 PM

सकारात्मक दृष्टीने विचार करून पावले उचलली जावीत, असे मत मावळते जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त एन. के. राम यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देर्ट सिटी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणीपुरवठा योजना झाल्यानंतरचा येणारा काळ औरंगाबादसाठी चांगला असेल

औरंगाबाद : सद्य:स्थितीत शहरावर संकट नाही; परंतु सध्या शहर संक्रमण काळातून जात आहे. स्मार्ट सिटी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणीपुरवठा योजना झाल्यानंतरचा येणारा काळ औरंगाबादसाठी चांगला असेल. सकारात्मक दृष्टीने विचार करून पावले उचलली जावीत, असे मत मावळते जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त एन. के. राम यांनी व्यक्त केले. 

सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येताच, त्यांना भेटण्यासाठी अनेक शिष्टमंडळांनी गर्दी केली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. पत्रकारांशी त्यांनी तासभर गप्पा मारत वर्षभरात केलेल्या कामांबाबत तसेच पालिकेतील महिनाभराच्या अनुभवाचे कथन केले. 

सर्वसामान्यांना सर्वाधिक वेळ राम यांनी वर्षभराच्या कार्यकाळात दिला. १५० कोटी रोडसाठी, ३०० कोटी स्मार्टसिटी, ९० कोटी कचरा व्यवस्थापन, ८०० कोटी समांतर जलवाहिनीसाठी, अशी कामे शहरात झाल्यानंतर संक्रमणातून मुक्तता झालेली दिसेल, असे राम म्हणाले.

> प्रश्न : वर्षभरातच बदली कशी काय झाली.- एन. के. राम : माझे शासनामध्ये स्रोत नाहीत. परंतु बदली होणार अशी कुणकुण लागली होती. परंतु बदली वर्षभरात कशी काय झाली, याबाबत मला काही सांगता येणार नाही. पण पुण्यासारख्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणे हे महत्त्वाचे आहे.

> प्रश्न : औरंगाबादेत कामाचा अनुभव क सा राहिला.- एन. के. राम : हे शहर व जिल्हा चांगला आहे. काम करण्याची संधी मिळाली. यवतमाळ-अमरावतीमधील कामाचा अनुभव बीडमध्ये कामी आला. औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी आणि पालिका या दोन्ही पदांवर काम करण्याचा अनुभव मिळाला. बीडमध्ये जलसंधारणाचे काम करण्याची संधी मिळाली. 

> प्रश्न : पालिकेत काम करताना महिना कसा गेला.- एन. के. राम : मनपा कार्यक्षेत्रासाठी मोठे अधिकारी आहेत. साडेसात कोटींची कामे मंजूर केली. ७ कोटी कम्पोस्टिंगसाठी देता आले. कचरा व्यवस्थापनात चांगले काम करता आले. पालिकेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा, यासाठी काम केले. पावसाळ्यापूर्वी कचऱ्याची समस्या पूर्णत: दूर होईल, असे वाटते आहे. तीन झोनमध्ये कचरा प्रक्रि येसाठी जागा नाही, त्या जागा लवकरच मिळतील. 

> प्रश्न : पाणीपुरवठ्यासाठी काम करता आले काय.- एन. के. राम : पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. शहरातील पाणीपुरवठा असमान आहे. त्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच बदलीचे आदेश आले. 

> प्रश्न : महसूल प्रशासनातील कामाचा अनुभव कसा राहिला.- एन. के. राम : महसूल प्रशासनात काम करताना ई-म्युटिशन ९० टक्के केले. आॅनलाईन सातबारा पूर्ण होत आले आहे. येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर पाणीटंचाईचे आव्हान असणार आहे. समृद्धीसाठी ९०० हेक्टर जमीन दिली. सोलापूर- धुळे महामार्ग भूसंपादनाला गती दिली. 

> प्रश्न : विभागीय आयुक्तांशी काही वाद होते काय?- एन. के. राम : विभागीय आयुक्त व माझ्यात काहीही वाद नव्हते. उपजिल्हाधिकारी कटके, गावंडे यांच्या निलंबनावरून वाद झाले. परंतु आयुक्तांकडून प्रशासकीय अनुभवाची शिदोरी मिळाली. औरंगाबादेत खूप काम करायचे होते, पण वेळ नाही मिळाला.

टॅग्स :Navalkishor Ramनवलकिशोर रामAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTransferबदली