शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

औरंगाबाद मनपाकडून कचरा वर्गीकरणासाठी एक हजार कर्मचारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:41 AM

तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहरात मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारी प्रत्येक निवडणूक वॉर्डासाठी १० कर्मचारी नियुक्त केले.

औैरंगाबाद : शहरातील कचरा कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करण्याचा प्रयोग राजकीय सूडबुद्धीने हाणून पाडण्यात आला. शहरातील कचराकोंडी फुटू नये असे वाटणाऱ्यांचे पितळही यानिमित्ताने उघडे पडले. शहरात २५ हजार मेट्रिक टन कचरा असून, महापालिका प्रशासनाने सोमवारी प्रत्येक निवडणूक वॉर्डासाठी १० कर्मचारी नियुक्त केले. तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

शहरात मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. १५१ दिवसांपासून शहरातील १५ लाख नागरिक कचऱ्याची दुर्गंधी, त्यातील अळ्या, माशांचा प्रादुर्भाव मुकाटपणे सहन करीत आहेत. महापालिका प्रशासन कचराकोंडी तूर्त कशी फुटेल, नागरिकांचे आरोग्य अबाधित कसे राहील यादृष्टीने कोणतेच प्रयत्न सुरू केलेले नाहीत. शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेतला. महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांची परवानगी मिळवून पिशोर येथील सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेवर रविवारी २० ट्रक कचराही टाकला. प्रखर विरोध, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झालेला नव्हता. स्वत: आ. जाधव समोर उभे राहून मनपाचे ट्रक रिकामे करून घेत होते. अचानक महापालिकेने कचरा टाकण्याची मोहीम थांबविली. कोणाच्या आदेशावरून मोहिमेला पूर्णविराम देण्यात आला हे गुलदस्त्यात आहे.

शहरातील कचरा शहरातच साचून राहावा असे कोणाला वाटते, त्या राजकीय मंडळींवर आ. जाधव यांनी सडकून टीकाही केली. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले. या डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकाऱ्यांनी वेगळी शक्कल लढविली. सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक शहरात दाखल होताच सकाळी ९ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैैठकीत ११५ वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेचे वॉर्डनिहाय दहा कर्मचारी नियुक्त करावेत, असा आग्रह धरण्यात आला. आयुक्तांनीही क्षणार्धात होकार दर्शविला. दुपारी १ हजार कर्मचाऱ्यांच्या वॉर्डनिहाय नियुक्तीचे आदेशही काढण्यात आले. उद्यापासून हे कर्मचारी प्रत्येक वॉर्डात फिरून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

रोगराई पसरल्यास जबाबदार कोण?१६ फेबु्रवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी, औैरंगपुरा आदी अनेक भागांत कचऱ्याचे मोठमोठे डोंगर आहेत. या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, शहराबाहेर नेऊन खतनिर्मिती करणे, यावर महापालिका प्रशासन अजिबात विचार करायला तयार नाही. कचराकोंडीमुळे शहरात रोगराई पसरल्यास त्याला जबाबादार कोण राहणार आहे.

कर्मचाऱ्यांना दंड लावणारशहरातील प्रत्येक वॉर्डात शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन झालेच पाहिजे. ओला व सुका कचरा वेगळा करायलाच हवा. रस्त्यावर कोणी कचरा टाकला तर संबधित सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी यांना सामूहिकपणे दंड लावण्यात येणार असल्याची घोषणा महापौैर नंदकुमार घोडेले यांनी केली. यानंतरही कामात सुधारणा न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल. इंदौैर महापालिकेने एक हजार कर्मचारी निलंबित केले होते. त्याच धर्तीवर महापालिका व्यापक उपाययोजना करणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद