शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

महापालिका काढणार ३०० कोटींचे कर्जरोखे; कर वसुली घटल्याने तिजोरीत खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 18:52 IST

Aurangabad Municipal Corporation शहरात अत्यावश्यक सोयीसुविधा देतानाच महापालिकेची प्रचंड कसरत होत आहे.

ठळक मुद्देमालमत्ता गहाण देऊन उभारणार पैसे मूलभूत सोयीसुविधांसाठी निधीची गरज

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती अधिक बिकट झाली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला. सर्व निर्बंधही उठविण्यात आले तरी महापालिकेची (Aurangabad Municipal Corporation) अर्थव्यवस्था रुळावर यायला तयार नाही. त्यामुळे ३०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारून अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी खासगी बँकेसोबत चर्चाही करण्यात आली. महापालिकेच्या काही मालमत्ता तारण ठेवून हे कर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

शहरात अत्यावश्यक सोयीसुविधा देतानाच महापालिकेची प्रचंड कसरत होत आहे. कचरा संकलन, पथदिव्यांचे बिल, पथदिव्यांच्या कंपनीला देण्यात येणारा हप्ता, पाणीपुरवठ्याचा खर्च, खासगी एजन्सीमार्फत घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार, शहरातील ड्रेनेज दुरुस्ती आदी अत्यावश्यक कामांवर दरमहा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. खर्च जास्त उत्पन्न कमी अशी अवस्था मागील काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी कायमस्वरूपी कोणत्याही योजना केलेल्या नाहीत. मालमत्ता कर, पाणीपट्टी हे दोन मोठे स्त्रोत महापालिकेकडे आहेत. दोन वर्षांपासून अनेक नागरिक कर, पाणीपट्टीही भरत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडे विकासकामांसाठी पैसा नाही. त्यातच स्मार्ट सिटी योजनेत मनपाला स्वत:चा वाटा म्हणून २५० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत ६८ कोटी रुपये स्मार्ट सिटीत टाकण्यात आले. उर्वरित १८२ कोटी रुपये टाकल्याशिवाय पुढील निधी मिळणार नाही, असे केंद्र आणि राज्य शासनाने मनपाला बजावले आहे. किमान १०० कोटी रुपये तातडीने स्मार्ट सिटीत टाकण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. कर्ज काढण्याशिवाय मनपासमोर दुसरा कोणताही उपाय नाही. त्यामुळे या पर्यायाचा विचार प्रशासनाने सुरू केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

वेगवेगळ्या बँकांसोबत चर्चामहापालिका प्रशासनाने सेंट्रल बँक, कॅनरा बँक, एचडीएफसी, बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांसोबत प्राथमिक चर्चा सुरू केली. कोणत्या बँकेचे व्याजदर किती आहेत. सर्वात कमी व्याजदर कोणाचे यासंदर्भात चाचपणी करण्यात आली. बँकांनी महापालिकेकडे बॅलन्स शिट, कर्जाच्या बदल्यात कोणत्या मालमत्ता तारण ठेवणार, अशी विचारणा केल्याचे कळते.

ट्रिपल प्लस बी प्लसदेशातील इकरा या शिखर संस्थेने अलीकडेच महापालिकेला ट्रिपल प्लस बी प्लस अशी रँकिंग दिली आहे. महापालिकेतील आर्थिक शिस्तीच्या बळावर हे मानांकन देण्यात आल्याने कर्जरोखे उभारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे बाजारात महापालिकेची पतही वाढल्याचे सूत्रांनी नमूद केले.

२५० कोटींचे कर्ज फेडले२०११-१२ मध्ये महापालिकेने खासगी बँकेकडून २५० कोटींचे कर्ज घेतले होते. वीज वितरण कंपनीची थकबाकी एकाचवेळी संपविण्यासाठी महापालिकेने हे कर्ज काढले होते. नियमित हफ्ते भरून महापालिकेने हे कर्ज अलीकडेच फेडले. २१ मालमत्ता गहाण ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील १४ मालमत्ता सोडवून घेतल्या. उर्वरित मालमत्ता बँकांकडून परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका