शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

प्रतीक्षा संपली ! महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार; ३८ प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 12:55 IST

Aurangabad Municipal Corporation Election : कोरोना संसर्ग, नवीन आरक्षण सोडतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता.

ठळक मुद्दे. आयोगाने उचललेल्या ठोस पावलामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता महापालिकेने यापूर्वी तयार केलेली एक सदस्यीय वॉर्ड रचना रद्द करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे

औरंगाबाद : शहरातील सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीची ( Aurangabad Municipal Corporation Election) आतूरतेने वाट पाहत होते. अखेर या कुरुक्षेत्राचा रणसंग्राम सुरू होणार असल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) महापालिकेला दिले. शासनाने मंजूर केलेल्या नवीन नियमानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एकूण ३८ प्रभाग असतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. ३ वॉर्डांचे ३७, तर ४ वॉर्डांचा एक स्वतंत्र प्रभाग असणार आहे. २०११ मधील लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची एक समिती गठित करावी, असे प्रशासनाला सूचित केले आहे. आयोगाने उचललेल्या ठोस पावलामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिकेची मुदत एप्रिल २०१९ मध्ये संपली. कोरोना संसर्ग, नवीन आरक्षण सोडतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. इकडे ११५ वॉर्डांतील इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक चातकाप्रमाणे आयोगाच्या आदेशाची वाट पाहात होते. आयोगाने राज्यातील २१ महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. यात औरंगाबादचाही समावेश आहे. महापालिकेने यापूर्वी तयार केलेली एक सदस्यीय वॉर्ड रचना रद्द करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले असून, ५ ऑक्टोबरपासूनच कामाला सुरुवात करावी, असे निर्देश दिले आहेत.

‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले‘लोकमत’ने २५ सप्टेंबर २०२१ रोजी शहरात एकूण ३८ प्रभाग होतील असे वृत्त प्रसिद्ध केले होते. ३ वॉर्डांचा एक याप्रमाणे शहरात ३७ प्रभाग नव्याने तयार होतील. सातारा-देवळाईतील ४ वॉर्डांचा एक प्रभाग असेल असेही वृत्तात म्हटले होते. आयोगाने काढलेल्या आदेशात यावर शिक्कामोर्तब झाले आहे.आयोगाने दिलेली लोकसंख्या-१२,२८,०३२अनुसूचित जाती लोकसंख्या- २,३८,१०५अनुसूचित जमाती - १६,३२०

आयोगाच्या मनपाला सूचना :

  •  २०११ च्या जनगणनेनुसार प्रगणक गटनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या, नकाशे उपलब्ध करून घ्यावेत.
  •  कच्चा आराखडा तयार करताना अनुभवी अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आवश्यकतेनुसार घ्यावेत.
  • प्रभागाची लोकसंख्या दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त ठेवता येईल.
  • प्रभागातील मोठे रस्ते, गल्ली, नद्या, नाले, डोंगर, उड्डाणपूल नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊनच हद्द निश्चित करावी.
  • प्रभागातील वस्त्यांचे विभाजन हाेणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • राजकीय दबावाला बळी पडून अनेकदा रचना केली जाते. त्यामुळे काटेकोरपणे काम करावे.
टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक