शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

औरंगाबाद मनपात बांधकाम परवानगीच्या तब्बल ८०० संचिका प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:42 PM

महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी तब्बल ८०० संचिकांचा डोंगर साचला आहे.

ठळक मुद्देनगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी तब्बल ८०० संचिकांचा डोंगर साचला आहे. संबंधित प्रकल्पांची किंमत जवळपास १५०० कोटी रुपयांपर्यंतची आहे.  येणाऱ्या काही दिवसांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार आहे.

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सोमवारपासून बांधकाम परवानगी देणे १०० टक्के बंद केले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी तब्बल ८०० संचिकांचा डोंगर साचला आहे. या संचिकांशी संबंधित प्रकल्पांची किंमत जवळपास १५०० कोटी रुपयांपर्यंतची आहे.  येणाऱ्या काही दिवसांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार आहे. राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत बांधकाम परवानगी देणे सुरू ठेवा, अशी मागणी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी एका पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी मात्र  बांधकाम बंदीच्या संचिकांवर अद्याप सही केलेली नाही.

घनकचरा व्यवस्थापनात महाराष्ट्र शासनाला अपयश आल्याचा ठपका ठेवत शुक्रवार, ३१ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामे बंद करावीत, असे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाने राज्यातील महापालिकांना बांधकाम परवानगी देणे थांबवा, असे आदेश अद्याप जारी केलेले नाहीत; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने स्वत:हून सोमवार, ३ सप्टेंबरपासून बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. मागील तीन दिवसांमध्ये महापालिकेने बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या संचिका इनवर्ड करून घेणे सुरू ठेवले; मात्र एकही नवीन बांधकाम परवानगी दिलेली नाही. काही बांधकाम परवानगीच्या संचिका मंजूर करून ठेवण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगीसाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या फायलींची संख्या जळपास ८०० पेक्षा अधिक आहे. यामध्ये १००० चौरस फुटांपासून १० हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांचा समावेश आहे. प्रत्येक फाईलनुसार स्थळ पाहणी, कागदपत्रांची बारकाईने छाननी, आदी कामांमुळे बराच वेळ लागतो. एक फाईल मंजूर होण्यासाठी किमान दोन ते तीन महिने सहजपणे लागतात. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत नगररचना विभागाने ६२४ फायली मंजूर केलेल्या आहेत. आणखी ८०० फायलींवर अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.

आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्षबुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिका आयुक्तांना एक पत्र दिले. या पत्रात त्यांनी नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदर करीत प्रशासनाने सोमवारपासून बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. यासंदर्भात राज्य शासनाने महापालिकेला कोणतेच आदेश दिलेले नाहीत. राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत तरी बांधकाम परवानगी देणे सुरू ठेवावे. महापौरांच्या मागणीनंतर आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय