शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:19 IST

गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील ५० हून अधिक वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. मात्र यातील काही वॉर्डांची पाहणी केली असता, गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील समतानगर, भाग्यनगर, जयविश्वभारती, सिल्लेखाना, पैठण गेट, गांधीनगर, दलालवाडी वॉर्डातील कचऱ्याच्या स्थितीचा आढावा ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला असता यातील बहुतांश वॉर्डांतील गल्लीबोळांमध्ये कचरा आढळून आला नाही. अनेक छोट्या रस्त्यांवर महिनाभरापूर्वी असणारा कचरा उचलण्यात आला आहे.

तसेच काही वॉर्डांत एक दिवसाला तर काही ठिकाणी दोन दिवसाला कचऱ्याची गाडी येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मात्र वॉर्डातील संकलन केलेला कचरा विघटनासाठी कोठेही घेऊन न जाता थेट त्या वॉर्डांच्या जवळपास असलेल्या सार्वजनिक जागेच्या परिसरात, रस्त्याच्या कडेला टाकल्याचे प्रत्येक वॉर्डात आढळून आले. या प्रकाराविषयी नागरिकांना विचारले असता, बहुतांश जणांनी अगोदर गल्लीत असणारा कचरा किमान रहदारीच्या घरांपासून थोडा फार दूर गेला. याचेही समाधान असल्याचे सांगितले. मात्र रस्त्यांवरून जाता-येता या साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी असहाय असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.

 

कचराच कचरा : सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर,  मुकुंदवाडीत सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत कचऱ्याची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधीने बुधवारी दुपारी फेरफटका मारला असता स्वच्छतामागे दडलेली अस्वच्छता समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

सुरेवाडी- जाधववाडीलगत मोंढा असल्याने मोकाट जनावरे तसेच टाकाऊ कचऱ्याची ढिगारे दर्शनी प्रवेश करताना निदर्शनात पडले. गल्लीबोळातील नागरिकांनी ठराविक ठिकाणीच कचरा टाकावा, अशा सूचना दिल्या असल्या तरी कचरा जाळण्याच्या धुराने कायम प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनात आले. 

आंबेडकरनगर परिसरात आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेवरच जळगाव रोडवर आरोग्य खराब करण्याचा प्रयत्न सुरू असून, कचऱ्याचा डोंगर आवारात दिसला, तर अंतर्गत वाहणाऱ्या गटारीत कचरा ढकलून दिल्याने दुर्गंधीत अधिक भर पडलेली दिसली. 

ब्रिजवाडीत मुख्य रस्त्यालगत झाडांच्या आड कचरा टाकला जात असून, काही ठिकाणी जाळला जातो तर उर्वरित कचरा नाल्यात टाकून दिल्याने मोकाट जनावरे अस्वच्छता पसरवीत आहेत. 

संजयनगरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारी तुडुंब भरल्या असून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भिंतीला कचराकुंडीचे स्वरूप देऊन ही कोणती स्वच्छता असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मुकुंदवाडीतील आरोग्य केंद्रासमोरच्या गटारीत कर्मचाऱ्यांनीच केरकचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली . मनपा शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकून अस्वच्छतेचे प्रदर्शन घडविले.  

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीगकचरामुक्त वॉर्ड झाल्याचा गवगवा करीत २ आॅक्टोबर रोजी पालिकेने सन्मान सोहळा उरकला असला तरी ५० टक्के वॉर्डांत कचऱ्याची समस्या अजून पूर्णपणे संपलेली नाही. वॉर्डातून उचललेला कचरा त्याच परिसरात कुठेतरी साचविला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. कचरा जाळणे, बॅगांमध्ये भरून रस्त्याच्या बाजूला ठेवणे, दुभाजकांत आणून टाकण्याचा प्रकार काही वॉर्डांत सुरूच आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका