शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:19 IST

गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील ५० हून अधिक वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. मात्र यातील काही वॉर्डांची पाहणी केली असता, गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील समतानगर, भाग्यनगर, जयविश्वभारती, सिल्लेखाना, पैठण गेट, गांधीनगर, दलालवाडी वॉर्डातील कचऱ्याच्या स्थितीचा आढावा ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला असता यातील बहुतांश वॉर्डांतील गल्लीबोळांमध्ये कचरा आढळून आला नाही. अनेक छोट्या रस्त्यांवर महिनाभरापूर्वी असणारा कचरा उचलण्यात आला आहे.

तसेच काही वॉर्डांत एक दिवसाला तर काही ठिकाणी दोन दिवसाला कचऱ्याची गाडी येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मात्र वॉर्डातील संकलन केलेला कचरा विघटनासाठी कोठेही घेऊन न जाता थेट त्या वॉर्डांच्या जवळपास असलेल्या सार्वजनिक जागेच्या परिसरात, रस्त्याच्या कडेला टाकल्याचे प्रत्येक वॉर्डात आढळून आले. या प्रकाराविषयी नागरिकांना विचारले असता, बहुतांश जणांनी अगोदर गल्लीत असणारा कचरा किमान रहदारीच्या घरांपासून थोडा फार दूर गेला. याचेही समाधान असल्याचे सांगितले. मात्र रस्त्यांवरून जाता-येता या साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी असहाय असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.

 

कचराच कचरा : सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर,  मुकुंदवाडीत सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत कचऱ्याची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधीने बुधवारी दुपारी फेरफटका मारला असता स्वच्छतामागे दडलेली अस्वच्छता समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

सुरेवाडी- जाधववाडीलगत मोंढा असल्याने मोकाट जनावरे तसेच टाकाऊ कचऱ्याची ढिगारे दर्शनी प्रवेश करताना निदर्शनात पडले. गल्लीबोळातील नागरिकांनी ठराविक ठिकाणीच कचरा टाकावा, अशा सूचना दिल्या असल्या तरी कचरा जाळण्याच्या धुराने कायम प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनात आले. 

आंबेडकरनगर परिसरात आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेवरच जळगाव रोडवर आरोग्य खराब करण्याचा प्रयत्न सुरू असून, कचऱ्याचा डोंगर आवारात दिसला, तर अंतर्गत वाहणाऱ्या गटारीत कचरा ढकलून दिल्याने दुर्गंधीत अधिक भर पडलेली दिसली. 

ब्रिजवाडीत मुख्य रस्त्यालगत झाडांच्या आड कचरा टाकला जात असून, काही ठिकाणी जाळला जातो तर उर्वरित कचरा नाल्यात टाकून दिल्याने मोकाट जनावरे अस्वच्छता पसरवीत आहेत. 

संजयनगरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारी तुडुंब भरल्या असून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भिंतीला कचराकुंडीचे स्वरूप देऊन ही कोणती स्वच्छता असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मुकुंदवाडीतील आरोग्य केंद्रासमोरच्या गटारीत कर्मचाऱ्यांनीच केरकचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली . मनपा शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकून अस्वच्छतेचे प्रदर्शन घडविले.  

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीगकचरामुक्त वॉर्ड झाल्याचा गवगवा करीत २ आॅक्टोबर रोजी पालिकेने सन्मान सोहळा उरकला असला तरी ५० टक्के वॉर्डांत कचऱ्याची समस्या अजून पूर्णपणे संपलेली नाही. वॉर्डातून उचललेला कचरा त्याच परिसरात कुठेतरी साचविला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. कचरा जाळणे, बॅगांमध्ये भरून रस्त्याच्या बाजूला ठेवणे, दुभाजकांत आणून टाकण्याचा प्रकार काही वॉर्डांत सुरूच आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका