शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीग; औरंगाबादमध्ये गल्ल्यातील कचरा आला रस्त्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:19 IST

गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील ५० हून अधिक वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. मात्र यातील काही वॉर्डांची पाहणी केली असता, गल्लीबोळातील कोपऱ्यात साचलेला कचरा मोठ्या, रहदारीच्या रस्त्यांवर आला असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील समतानगर, भाग्यनगर, जयविश्वभारती, सिल्लेखाना, पैठण गेट, गांधीनगर, दलालवाडी वॉर्डातील कचऱ्याच्या स्थितीचा आढावा ‘लोकमत’ प्रतिनिधीने घेतला असता यातील बहुतांश वॉर्डांतील गल्लीबोळांमध्ये कचरा आढळून आला नाही. अनेक छोट्या रस्त्यांवर महिनाभरापूर्वी असणारा कचरा उचलण्यात आला आहे.

तसेच काही वॉर्डांत एक दिवसाला तर काही ठिकाणी दोन दिवसाला कचऱ्याची गाडी येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मात्र वॉर्डातील संकलन केलेला कचरा विघटनासाठी कोठेही घेऊन न जाता थेट त्या वॉर्डांच्या जवळपास असलेल्या सार्वजनिक जागेच्या परिसरात, रस्त्याच्या कडेला टाकल्याचे प्रत्येक वॉर्डात आढळून आले. या प्रकाराविषयी नागरिकांना विचारले असता, बहुतांश जणांनी अगोदर गल्लीत असणारा कचरा किमान रहदारीच्या घरांपासून थोडा फार दूर गेला. याचेही समाधान असल्याचे सांगितले. मात्र रस्त्यांवरून जाता-येता या साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी असहाय असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.

 

कचराच कचरा : सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर,  मुकुंदवाडीत सुरेवाडी-जाधवनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, संजयनगर, मुकुंदवाडीत कचऱ्याची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधीने बुधवारी दुपारी फेरफटका मारला असता स्वच्छतामागे दडलेली अस्वच्छता समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

सुरेवाडी- जाधववाडीलगत मोंढा असल्याने मोकाट जनावरे तसेच टाकाऊ कचऱ्याची ढिगारे दर्शनी प्रवेश करताना निदर्शनात पडले. गल्लीबोळातील नागरिकांनी ठराविक ठिकाणीच कचरा टाकावा, अशा सूचना दिल्या असल्या तरी कचरा जाळण्याच्या धुराने कायम प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनात आले. 

आंबेडकरनगर परिसरात आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेवरच जळगाव रोडवर आरोग्य खराब करण्याचा प्रयत्न सुरू असून, कचऱ्याचा डोंगर आवारात दिसला, तर अंतर्गत वाहणाऱ्या गटारीत कचरा ढकलून दिल्याने दुर्गंधीत अधिक भर पडलेली दिसली. 

ब्रिजवाडीत मुख्य रस्त्यालगत झाडांच्या आड कचरा टाकला जात असून, काही ठिकाणी जाळला जातो तर उर्वरित कचरा नाल्यात टाकून दिल्याने मोकाट जनावरे अस्वच्छता पसरवीत आहेत. 

संजयनगरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारी तुडुंब भरल्या असून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भिंतीला कचराकुंडीचे स्वरूप देऊन ही कोणती स्वच्छता असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मुकुंदवाडीतील आरोग्य केंद्रासमोरच्या गटारीत कर्मचाऱ्यांनीच केरकचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली . मनपा शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकून अस्वच्छतेचे प्रदर्शन घडविले.  

कुठे हटले, तर कुठे साचले कचऱ्याचे ढीगकचरामुक्त वॉर्ड झाल्याचा गवगवा करीत २ आॅक्टोबर रोजी पालिकेने सन्मान सोहळा उरकला असला तरी ५० टक्के वॉर्डांत कचऱ्याची समस्या अजून पूर्णपणे संपलेली नाही. वॉर्डातून उचललेला कचरा त्याच परिसरात कुठेतरी साचविला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. कचरा जाळणे, बॅगांमध्ये भरून रस्त्याच्या बाजूला ठेवणे, दुभाजकांत आणून टाकण्याचा प्रकार काही वॉर्डांत सुरूच आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका