शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

औरंगाबाद जिल्ह्यात युतीच्या अपेक्षा उंचावल्या, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 05:34 IST

समीकरणे बदलली : वंचित बहुजन आघाडी करिश्मा दाखविणार का?, सुजात आंबेडकर यांच्या उमेदवारीची चर्चा

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. सेना- भाजपचे ठरले असले तरी औरंगाबाद जिल्ह्यात भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काँग्रेस पूर्णत: कोलमडून पडली आहे. काँग्रेसला योग्य उमेदवार मिळणेही कठीण दिसत आहे. कुणी स्वत:हून उमेदवारी मागायला येईल की नाही, अशीच परिस्थिती आहे.

लोकसभेला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे पराभूत झाले आणि मित्रपक्ष भाजपने औरंगाबाद शहर व जिल्ह्यावर आपली पकड वाढवायला सुरुवात केली. अतुल सावे यांना उद्योग व अल्पसंख्याक राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. शहराच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नांत अतुल सावे लक्ष घालीत आहेत.

औरंगाबाद मध्य, पूर्व व पश्चिम या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळविले आहे. साहजिकच या तीन मतदारसंघांतून आपण निवडून येऊ असा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीचा वाढला आहे. पूर्वसाठी मागच्या वेळी पराभूत झाल्यापासून डॉ. गफ्फार कादरी हे तयारी करीत आहेत. पश्चिममधून अमित भुईगळ हे इच्छुक आहेत. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे ते नजीकचेही मानले जातात. याठिकाणी मागील दोन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे संजय शिरसाट हेच रिपीट होतात की आणखी काही गडबड होते, हे पाहावे लागेल.

‘मध्य’मधून सुजात आंबेडकर?औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील आमदार आहेत. पण ते खासदार झाल्याने आता हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीसाठी सुरक्षित मानला जात आहे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांना येथून उमेदवारी देऊन निवडून आणावे व मुस्लिमांनी मते दिली नाहीत ही बाळासाहेबांची नाराजी झाली होती, ती दूर केली जावी, असे काहीसे ठरत असल्याची चर्चा आहे.भाजपचे तीन, एमआयएमचा एक, दोन शिवसेनेचे, एक राष्टÑवादी काँग्रेसचा आणि दोन अपक्ष आमदार, असे सध्याचे पक्षीय बलाबल आहे. अब्दुल सत्तार हे जिल्ह्यातील सिल्लोडहून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव आमदार होते. परंतु लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या बंडखोरीमुळे आणि काँग्रेसनेही आता त्यांना पक्षातून काढून टाकल्यामुळे काँग्रेस जिल्ह्यात आणखी वजा झाली.लोकसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळाले. त्यामुळे या किंवा वैजापूर मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे आपले नशीब अजमावतील, अशी चर्चा आहे. पण कन्नडला शिवसेनेतर्फे उदयसिंग राजपूत हे तिकिटाचे प्रबळ दावेदार मानले जातात. वैजापूरला आर. एम. वाणी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे लढू शकणार नाहीत.

वयोमानानुसार हरिभाऊ बागडे हे निवृत्त होऊ इच्छितात की फुलंब्री लढू इच्छितात, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. बागडे कुठल्या तरी राज्याचे राज्यपालही होऊ शकतात, त्यांना केले जाऊ शकते, असा तर्क व्यक्त केला जात आहे. फुलंब्रीत काँग्रेसतर्फे डॉ. कल्याण काळे हे तगडी लढत देऊ शकतात. गंगापूरहून प्रशांत बंब हेच भाजपचे उमेदवार असू शकतात. औरंगाबाद पूर्वचा तर आता काही विषयच नाही. कारण आमदार व राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांना आता भाजपअंतर्गतही कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही.लोकसभेत चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणलेले हर्षवर्धन जाधव हे कन्नडमधून अपक्ष लढतील किंवा वेळेवर ते काही तरी वेगळाच करिश्मा निर्माण करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. जाधव यांच्यासाठी सासरे रावसाहेब दानवे यांचा आशीर्वाद कमी होण्याची सुतराम शक्यता नाही.

काँगे्रस- राष्टÑवादी काँग्रेसची हालत मात्र खूपच खराब झाली आहे. दोघांनी आघाडी तरी ते यशापासून दूरच वाटतात.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा